चिंतन
श्रीराम,
अनेक गोष्टी पटो न पटो पण अपरिहार्य विहित
कर्तव्य म्हणून आपण पार पाडत असतो. अशावेळी आपले मन त्यात गुंतून रहात नाही. हे न गुंतणे म्हणजेच अनासक्ती.. परमार्थाला पूर्वजन्माच्या पुण्याईचे पाठबळ लागते. अनेकदा संत महात्मे आपल्याला भेटू शकतात परंतु श्रीसद्गुरूंची भेट होणे ही मानव जन्माच्या सार्थकतेची पर्वणी ठरते. अशावेळी सच्चिदानंदाची प्राप्ती करून घेण्याचे ध्येय जर आपले नसेल तर अवघे जीवन व्यर्थ होऊन जाते.
सच्चिदानंदाची प्राप्ती होण्यासाठी साधना कशी करावी, अनासक्तीने कसे रहावे हे न विचारता, संसारात मला हे हवे ते हवे असा आशीर्वाद मागणे म्हणजेच स्वतःच्या हाताने मानेवर दगड बांधून पाण्यात उडी मारणे.
समर्थ म्हणतात - :अकस्मात होणार होऊन जाते! थोडक्यात कधी काय होईल हे माहीत नसल्याने विहित कर्तव्य म्हणून संसार करायचा आणि सद्गुरूंच्या कृपेने जीवनाचे सार्थक करून घ्यायचे.
|| श्रीराम ||
No comments:
Post a Comment