संग्रहित संकलन आनंद पाटील
*जडाच चिंतन करणारी वृत्ती भगवंताकडे लावावयाची आहे आणि ती निरंतर / सातत्याने लावायची आहे. आपण* *नामचिंतन करत नाही असे नाही पण त्यात सातत्य आणि*
*अनुसंधान राहात नाही. म्हणून नाम सिद्धीला जात नाही.* *आणखी एक आहे, नामसाधना तेव्हाच सिद्धीला जाईल जेव्हा*
*भगवत्प्राप्ती हाच त्या नामसाधनेचा एकमेव हेतू असेल. अन्य कोणत्याही कामनेनं केलेला नामजप ती ती कामनापूर्ती करेल पण मग भगवंताला हा नामधारक कायमचा दुरावेल.*
*नामाखेरीज इतर साधनांनी प्राप्त होणारी पवित्रता पुन्हा मलिन होते, पण नामसंकीर्तनाने प्राप्त होणारी पवित्रता कधीच पुनः मलिन होत नाही.*
"पवित्र तो देह वाणी पुण्यवंत। जो वदे अच्युत सर्वकाळ ।। तयाच्या चिंतने तरतील दोषी । जळतील राशी पातकांच्या । "
*नामाचे आणि नामस्मरणाने प्राप्त होणारे पावित्र्य तीर्थादिकांपेक्षाही खूपच श्रेष्ठ आहे.*
"तीर्थांचे पैं तीर्थ, नाम हे समर्थ । होऊनि कृतार्थ हरिनामे ॥ "
*नाम हे स्वत: पूर्ण पवित्र आहे म्हणूनच ते नामधारकाला*
*अंतर्बाह्य पवित्र करू शकते.* *श्रीगुरु ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या एका अभंगात म्हणताहेत,*
" नाम पवित्र आणि परिकरु । कल्पतरूहूनि उदारु । ते का रे
सधरु । तेणे तरसी भवसागरु । ”
*पद्मपुराणात एक कथा आहे. एक राजा मोठा नामधारक होता. नामस्मरणाने तो इतका पवित्र झाला होता की, जेव्हा*
*त्याला विष्णूदूत वैकुंठास नेऊ लागले ती वाट यमलोकांवरून जात होती. या राजाच्या* *शरीरावरून येणाऱ्या वायूने नरकातील अनेक पापी जीवांचा उद्धार झाला. एवढी भक्तांच्या स्थूल देहाची पवित्रता आहे.(संकलन आनंद पाटील)*
*सर्वसामान्याला नामचिंतनात एवढे सामर्थ्य आहे याचे ज्ञान नसते. त्याकरिता “गुरुकृपा” पाहिजे. हे नामचिंतनाचे ज्ञान गूढ आहे, गम्य आहे, गंतव्य आहे. आपल्या चिरंतन स्वरुपाचे हे ठिकाण आहे. नाम, प्रेम, भक्ती ही गूढ रहस्ये आहेत.*
*गुरुकृपेवाचून ते कळत नाही. सद्गुरुकृपा होण्यासाठी त्यांच्या वचनावर प्राणापलीकडे निष्ठा हवी. मग त्यांच्याच कृपेने गूढगम्य असणारे भक्तीप्रेमसुख हाती येते. संकलन आनंद पाटील*
No comments:
Post a Comment