ज्ञानराज सांगताहेत, " अनंत जन्मांचे तप एक
नाम । "
*भगवन्नाम हे सामान्य नाही. अनंत जन्मात केलेल्या तपाचे हे फळ आहे. वाणीद्वारा एकवेळ नाम येणे, किंवा एका नामावर विश्वास राहणे हे अनंत जन्मांच्या तपाचे फळ आहे. भगवान अर्जुनाला* *सांगताहेत, “जयाचिये वाचे पुढा भोजे । अखंड नाम नाचत असे* *माझे । जे जन्मसहस्त्री वोळगिजे । एक वेळ यावया ॥* *तप केले असेल कोटी । तरीच नाम येईल ॥” नामदेवराय म्हणतात, "अनंत पुण्यराशी घडेल ज्यापाशी ।*
*तरीच मुखासी नाम येत ।। " नाथराय म्हणतात,*
" *अनेक जन्मांचे सुकृत पदरी । त्याचे मुखी हरी पैठा होय ।। "*
*सहस्त्रावधी जन्मात तप करून, ज्ञान, योग करून ज्यांची पापे क्षीण झाली आहेत अशा* *अंत:करणातच परमात्मा भक्ती उत्पन्न होते; नामाविषयी*
*विश्वास दृढ असतो. अनंत जन्मांचे तप आणि एक नाम सारखे आहे. म्हणजे अनंत जन्मांच्या तपाचे फळ व एका* *नामाचे फळ समान आहे. किंबहुना अनंत जन्मांच्या तपाने जे साध्य होत नाही ते फक्त एक वेळ पूर्ण प्रेमाने नाम घेतल्याने प्राप्त होते. “नारायण नाम* *घालिता तुकासी । न येती या राशी जप तीर्थे ।" नामदेवराय म्हणतात. "सर्व काळ हरिनाम । हेचि*
*तपामाजी तप ॥'*
*अनंत जन्मांचे तप आणि एक नाम समान आहे. एवढंच नाही तर किंबहुना अनंत जन्मांच्या तपाने जे साध्य होत नाही, ते* *एकवेळ पूर्णप्रेमभावाने नाम घेतल्याने अगदी सहजी प्राप्त होते. नामस्मरणात एवढी सिद्धी* *असल्याचे कारण असे की, आपल्या नावावर भगवंताचे विलक्षण प्रेम आहे.*
"*आवडे तयाचे नाम घेता तयासी ।। "*
संकलन आनंद पाटील
No comments:
Post a Comment