TechRepublic Blogs

Sunday, July 6, 2025

चिंतन

 नामस्मरणाला बसताना श्रीगोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातील किंवा आपल्या सद्गुरुंच्या चरित्रातील किंवा संदर्भातील एखादा प्रसंग मनात घोळवावा आणि त्या प्रसंगाचे चिंतन करीत नाम घ्यावे. 

नाहीतरी नाम घेताना चित्त एकाग्र कुठे होते. काहीतरी फालतू विचार चालू असतात. त्यापेक्षा सत्पुरुषांच्या दिव्य जीवनाचे चिंतन करावे. 

उदा. शबरी अनाडी  स्त्री. पण श्रद्धा केवढी ! कोणत्याही दिवशी राम येईल म्हणून रोज त्याच्या स्वागताची तयारी करायची. तिचा भाव अनुकरण करण्यासारखा आहे. भगवंताचे दर्शन होण्यासाठी दोन गुणांची आवश्यकता असते. एक निकडीची तळमळ आणि पराकोटीची  चिकाटी लागते.

 शबरीच्या ठिकाणी या दोन्ही गुणांचा उत्कर्ष आढळतो. भरत आणि हनुमंत हे फार वरच्या दर्जाचे आहेत. प्रल्हादही तसाच. तेव्हा आपल्याला शबरी बरी. तुळशीदासांनाही रामाशिवाय दुसरे काही सुचतच नसे. हे बरंच पण हा दिव्य भ्रम होता. विनयपत्रिका दोहावली रामचरीतमानस सर्वात एका रामाखेरीज दुसरे काही नाहीच.

No comments:

Post a Comment