विश्वास परिपक्व झाला की श्रद्धा होते. श्रद्धा ही आतून येते. श्रद्धा ही जिवंत आहे.विश्वास हा सगळा उसना घेतलेला असतो.
विश्वास शब्दाचा अर्थ " विशेष रुपेन श्वसती " माणूस श्वास घेतो, पण तो जेव्हा अस्वस्थ असतो तेव्हा श्वास अस्वस्थ होतो. तो जेव्हा शांत होतो तेव्हा विश्वास. म्हणजे काही सांगितल्यावर मन शांत होणे म्हणजे विश्वास. विश्वासाचं मूळ असेल तर माणूस हा मूळ आहे. विश्वास कोणावर ठेवायचा तर ज्याला आप्त वाक्य म्हणतात , त्यावर विश्वास ठेवायचा.
आप्त म्हणजे आपला नातेवाईक. आप्तवाक्यवर विश्वास ठेवायला त्या आप्ता मध्ये तीन गुण हवेत. पहिला गुण तो त्या विषयातील तज्ञ हवा. दुसरा गुण असा की त्याची आपल्याविषयी हितबुध्दी पाहिजे. याचं कल्याणाच व्हावं असं त्याला वाटलं पाहिजे. तिसरा गुण त्याच मत निश्चित पाहिजे. आपल्या सगळ्या आप्तातील आप्त , सर्व आप्तांचा राजा जर कोणी असेल तर तो भगवंत आहे.
No comments:
Post a Comment