TechRepublic Blogs

Thursday, July 24, 2025

विश्र्वस्वामी

 जीवाच्या वासना तृप्त करून सुद्धा अपुर्णपण लोपत नाही. जो माणूस पूर्णतेच्या हाकेला प्रतिसाद देतो आणि जिवनशक्तीच्या महासागरात विलीन होतो तो एकदम पूर्ण तृप्त होतो व परम शांत होतो. 

पूर्णतेच्या समग्रपणामुळे वासना शून्य होतो. वासनाशुन्य झालेल्या मनाला अभंग साम्य अवस्था  प्राप्त होते. मनाच्या साम्यावस्थेत स्थिर झालेल्या माणसाला संत म्हणतात. नि:शेष वासनारहित होणे ही संतांची खूण आहे. माणूस हा विश्वाचा घटक आहे.

 वासनेमुळे माणूस आणि विश्व यांच्यामध्ये विसंवाद उत्पन्न होतो. वासना विरली की मूळचा संवाद प्रगट होतो व माणूस समाधान पावतो. समाधान पावलेल्या माणसाच्या अंतर्यांमी विश्र्वस्वामी जो ईश्वर त्याचे अस्तित्व उदय पावते, अंतरी स्थिरावते त्याला संत म्हणतात.

No comments:

Post a Comment