सज्जनगडाच्या पायथ्याला एक छोटंस टपरीवजा हॉटेल होतं.. आज ते तिथं नाही. पण त्या टपरीसाठी उभ्या केलेल्या सातही खांबांना मात्र पालवी फुटलीय. जीवन जगण्याची गोष्ट आहे... ही अगम्य गोष्टच हे खांब सांगून जातात. ज्या खांबांना वाळून नंतर जळण बनायचं होतं ते आजही फुलताहेत, बहरताहेत... आणि आपण माणसं मात्र छोट्या छोट्या गोष्टींनी हतबल होतो, प्रतिकूल परिस्थितीत गलितगात्र होतो. जगण्याची आशा सोडून देऊन मरणाची, आत्मघाताची भाषा बोलू लागतो. किती विचित्र आहे ना? या ७ खांबांपासून आपण काय घ्यावं हे ज्याचं त्यानं ठरवावं...पण मला मात्र एक नवीन विचार मिळाला.
TechRepublic Blogs
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment