आपला जो देह आहे याची इंद्रिय
काम करतात , ही जी इंद्रिय काम करतात ते काम प्रकृती करते. याचा अर्थ असा की जगात काम करणाऱ्या शक्ती ज्या आहेत त्या शक्ती तुम्हाला नाचवतात. साधं हवा पाणी बिघडलं की तुम्हाला जाणवतं. या जगातल्या ज्या शक्ती आहेत त्या मला नाचवतात ही भावना व्हायला तो कर्ता आहे ही भावना झाली पाहिजे. परमार्थाचे विनाउपाधीकरणं जर असेल तर मी आहे पण मी कर्ता नाही तो कर्ता आहे हे समजायला हवे. हीच गुरुआज्ञा आहे. पु.श्री.ज्ञानेश्वर महाराज म्हणाले "मन भ्रांतीपासून सुटले आणि गुरुवाक्ये मन धुतले."
आपल्या मनात जर सगळा मळ असेल तर मी करतो. मी करतो हा आहे. आपण काय करणार आहोत या जगातल्या शक्तींपुढे. आपले सामर्थ्य मुंगी इतके सुद्धा नाही, आपल्या हातात काय आहे? जेव्हा माझ्या सकट माझं जीवन आहे ते सगळे तुझ्या सत्तेने आहे हे गुरुवाक्य आहे .
या वाक्याने मन धुतले जाईल. आपले गुरू देहात असोत किंवा नसोत " तो कर्ता आहे मी कर्ता नाही " ही त्यांची आज्ञा असते. ही आज्ञा पाळन हे शिष्याचं आद्य कर्तव्य असतं. तीन गोष्टी दुर्लभ आहेत. देवाची कृपा असेल तर मिळतात.१) मनुष्य देह २) मोक्षाची इच्छा ३) महापुरुषांचा सहवास. सत्पुरुषांकडे अनेकजण जातात. तो सत्पुरुष त्यांना आपलं म्हणत नाही. कारण त्या जीवाचा उद्धार होईपर्यंत त्याची जबाबदारी घ्यावी लागते. तर त्याने आपला म्हणण्यासाठी काय लागत तर "मी तुझ्या चरणांशी आलो आहे मी खरा कर्ता नाही" हे म्हटलं की त्याची कृपा होते.
No comments:
Post a Comment