TechRepublic Blogs

Wednesday, July 17, 2024

श्रीमहाराज

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*पू. बाबा : बाळंभट जोशांचे गांजाचे व्यसन श्रीमहाराजांनी कसे सोडवले ते श्रीमहाराजांच्या चरित्रात आहेच. बाळंभटांना दोन-तीन मुली होत्या. त्यांच्या बायकोला श्रीमहाराजांनी तुम्हाला काय पाहिजे म्हणून विचारले. त्या म्हणाल्या मुलगा पाहिजे. यावर श्रीमहाराज, काय शिंची बायकांची बुद्धी तरी, म्हणाले व तिला म्हणाले, बाई, पण ते शेवटास जाणार नाही. तरीही तिने हट्ट धरल्यावर म्हणाले, ठीक आहे. पुढे मुलगा झाला आणि २०-२२ वर्षांचा होऊन वारला. बाईंनी श्रीमहाराजांना अजिबात दोष दिला नाही. पुढे त्यांची विपन्नावस्था आली तरी शेवटपर्यंत त्या समाधानात होत्या.*


*अशीच गोष्ट श्री. गणपतराव दामल्यांच्या पत्नीची. श्री गणपतरावांच्या मृत्यूनंतर त्यांचा मोठा मुलगा श्री. रामकृष्णपंत जलोदराने वारले. पुढे बाईही खूप आजारी होत्या. मी त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हां विचारले की श्रीमहाराजांनी असे कसे केले असे नाही का वाटत ? तेव्हां आजारी असूनही एकदम अर्धवट उठून बसत त्या म्हणाल्या, त्यांना का दोष देता? हे आपल्या प्रारब्धाचे भोग आहेत. श्रीमहाराजांनी सामान्यातून अशी निष्ठावान माणसे तयार केली. खरोखर, त्यांनी मातीतून अत्तर काढले !*


*-- अध्यात्म संवाद*

No comments:

Post a Comment