*पंगतीमधील आयुष्य रुपी पत्रावळ*
------------------------------
🪸 *श्रीदत्त,क्षेत्रस्थानी* *छानशी जेवणाची पंगत बसलेली आहे.*
*समोर असणाऱ्या पत्रावळीवर उत्तमोत्तम अन्न पदार्थ वाढण्याकरीता तयार होऊन येत आहेत.*
*जेवणासाठी नाना प्रकारच्या केलेल्या पक्वान्नांचा सुवासही दरवळत आहे.*
*सर्वत्र नुसता घमघमाट सुटलेला आहे.*
*वाढपी येऊन क्रमाक्रमाने एक एक जिन्नस पत्रावळीवरती वाढला जाऊ लागला.*
*पत्रावळ पूर्णपणे वाढून झाली.*
*वदनी कवळ------ झाले.*
*नमः पार्वतीपते हरहर महादेव. जयजयकार देखील म्हणून झाला.*
*आणि जेवायला सुरुवात झाली. आहाहा...बेत ऊत्तम होता. जेवता जेवता अखेरीस 'गोडासाठी जागा करा' 'गोडासाठी जागा करा' असे ओरडत,ओरडत एक वाढपी आला. त्याने गोड खमंग अशी पक्वान्ने' वाढायला आणली होती.*🪸
................................
*या जेवणावळी मधील पत्रावळीचा व वाढल्या जाणाऱ्या पदार्थांचा, आणि वाढप्याचा जर पूर्णपणे विचार केला. तर त्याचा खालीलप्रमाणे अर्थ निघतो.*
...........................
🪸 *ही जी पत्रावळ वाढलेली आहे ना. ती म्हणजे आपले आयुष्य आहे.*
*नानाविध पदार्थ वाढायला येत आहेत.*
*म्हणजेच आपल्या आयुष्यामधे येणारे निरनिराळे विविध टप्पे आहेत.*
*(आपण नेहमी म्हणतोच नां ? आयुष्यात समोर काय वाढून ठेवले आहे? देव जाणे)*
*ह्या वाढण्यासाठी आलेल्या पदार्थांमध्ये मीठ हे घातलेले आहेच. पण तरीही पत्रावळीत आणखी जादा मीठ वाढले गेलेले आहे.*
*ह्याचा अर्थ असा की आयुष्यातील चालू कर्मभोगांसोबत*
*(प्रारब्धासोबत) गत कर्मभोगांचाही परिणाम अर्थात गत "प्रारब्ध" हे देखील या बरोबरच भोगून संपवायचे आहे..*
*या पंगतीमधे वाढायला येणारा वाढपी म्हणजे दुसरा तिसरा कोणीही नसून तो पुढे,पुढे सरकणारा 'काळ' आहे.*
*जेव्हा हाच 'काळ' श्रीदत्त कृपेने "मोक्षरुपी" अशी गोड पक्वांने वाढायला घेऊन येतो. तेव्हा तो ओरडून,ओरडून जागृत करुन सांगत असतो.*
*बाबारे आता बस कर.! आपण स्वताहून प्रपंच रुपी पदार्थ आता जरा बाजूला सार. आणि भगवत भक्ती करुन जीवनात मोक्ष प्राप्ती मिळव.*
*ती मिळवण्यासाठी जागा पटापट रिकामी कर. अर्थात कर्मभोग आहेत ते भोगून संपव आणि मोक्षाला प्राप्त हो.*
*ज्यांनी लिहिले. त्यांनी किती छान दृष्टांत दिला आहे.विचार करायला लावणारा लेख आहे🙏.*
*अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त*
🙏🏼🚩🙏🏼🚩🙏🏼🚩🙏🏼🚩
No comments:
Post a Comment