*भवारोग आणि नामसाधना*
*श्रीमहाराज म्हणतात - आजारी माणसाला तीन गोष्टी कराव्या लागतात - कुपथ्य टाळणे, पथ्य पाळणे आणि औषध घेणे. मग आजार कोणताही असो. पण आपल्याला आजार झाला आहे* *ह्याची जाण झाली, त्याच्या निवारण्याची तीव्र इच्छा झाली, तरच या तीन गोष्टींकडे मनुष्य वळेल. शारीरिक आजार झाला असतां मनुष्य हे सर्व त्वरीत अंमलात आणतोच. पण* *मनुष्याला आपल्याला भवरोग झाला आहे ह्याची फार फार उशीरा जाण होते.*
*भवरोग निवारण उद्देशाने वाटचाल करणार्या मुमुक्षुसाठी श्रीमहाराजांचा वरील उपदेश.*
*कुपथ्य टाळणे - पांच ज्ञानेंद्रियांचा विषयांशी संबंध होणे हे अटळ आहे. तसेच पांच कर्मेंद्रियांद्वारे कर्मे घडणेही अटळच. आणि या सर्वांचा राजा जे 'मन' त्याचा व्यवहारही चालणारच. पण डोळ्यांनी* *काय पाहायचे [थोड्या* *निरीक्षणानंतर आढळेल की जास्तीत जास्त विकार* *डोळ्याद्वारे शरीरात, मनांत, बुद्धीत शिरतात), कानांनी काय ऐकायचे, तोंडाने काय आणि किती खायचे यांचा विवेकपूर्व विचार करून त्या त्या विषयांचे सेवन करणे हे माणसाच्या हाती आहे.
आपल्या हिताचे काय हे सर्वांनाच समजते. अहितकारक गोष्टींपासून इंद्रियांची निवृत्ति करीत विषयांचा दुष्परीणाम टाळणे म्हणजे कुपथ्य टाळणे. पथ्य पाळणे - कुपथ्यापासून निवृत्ति समजली की पथ्यकारक काय याबद्दल भार गहन अभ्यास आवश्यक आहे असे नव्हे.
डोळ्यांनी भगवंताचे रूप पाहणे - म्हणजेच चर-अचरात, सर्व प्राणीमात्रात भगवंताच्या अस्तित्वाची जाण ठेवणे, हातांनी कोणतीही क्रिया करताना भगवंताला आवडणार नाही असे कोणतेही कर्म न करणे, वाचेचा संयमित वापर म्हणजे निंदा टाळणे, वाचेद्वारे कोणालाही न दुखावणे इ. हे सर्व म्हणजे पथ्य पाळणे झाले.
पथ्य ह्यात आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी म्हणजे भ. गीता ६.१६,१७ इथे म्हटल्याप्रमाणे अती खाणे नको तसेच जळजळीत उपवास नको,अती झोप नको आणि अती जाग्रणही नको, अती आरामही योग्य नाही तसेच अती दमछाक होईपर्यंत काम करीत राहणे देखील योग्य नाही. सर्वकाही युक्त प्रमाणात, नियमीतपणे करणे.नामस्मरण हेच औषध सेवन - आता नामसमरणाचा औषध म्हणून कसा उपयोग करता येईल ?*
*माणसाच्या चित्त आणि वृत्ति स्वस्वरूप आनंद स्थितीपासून नेहमीच भलावण करीत असतात. ही भलावण न व्हावी यासाठी आपण काय पाहतोय, ऐकतोय, करतोय ह्याबद्दल सतत जागरूक राहणे नितांत आवश्यक असते. प्रसन असलेले मन कशामुळे कलुशित होते हे समजले तर औषधचा योग्य परिणाम होतो.
काही उदहरणे पाहू. एखादी न आवडणारे व्यक्ति समोर आली वा* *तिचे स्मरण झाले की त्या व्यक्तिबद्दल नकारात्मक (negative) विचार येतात. कासलातरी कर्कश आवाज कानी पडला, नको त्या वेळी (म्हणजे आपल्याला) पाऊस सुरू झाला, अवेळी फोन खणखणला, जिना उतरताना पाय मुरगळला, अप्राप्त विषयांची इच्छा, द्वेष, मत्सर अशा कितीतरी गोष्टी मनात उद्विग्न भाव उठण्यास, मनाची शांतवृत्ति बिघडविण्यास कारणीभूत होतात. असे झाले की लगेच "श्री राम जय राम जय जय राम" हा मंत्र अगदी सावकाश (म्हणजे ५ ते ७ सेकंद कालावधी लागेल इतके संथपणे) मनात म्हणावा अशी २-३ आवर्तने करावी. मनात उठलेली negative वृत्तिचे निवारण नाही झाले तर परत २-३ आवर्तनांचा एक डोस.
ज्याबद्दल आपण काहीच करू शकत नाही ( ज्या आपल्या हातात नाहीत ) अशा कितीएक गोष्टींपासून उद्विग्न होऊन, वैतागून साध्य तर काहीच होत नाही. मग औषधाचे २-३ डोस घेतले - अर्थात उठलेली negative वृत्तिचे निरसन होईपर्यंत - की मन पूर्ववत प्रसन होते. होता होता उद्विग्न व्हायचे प्रसंगच कमी झालेत असे जाणवते.
खरे तर प्रसंग कमी होत नाहीत. उद्विग्न व्हायची frequency कमी होते. पण या प्रयोगाचे एक गुपित आहे -* *नामाचे आवर्तन अगदी सावकाश करणे. प्रयोग करायला हरकत नाही ना ?
वरील औषध उपासना म्हणून नित्य, ठराविक जप करणे या व्यतिरिक्त आहे हे सांगणे आवश्यक नाहीच. संकलन आनंद पाटील*
No comments:
Post a Comment