*सहज बोलणे हितोपदेश* संकलनआनंद पाटील
*भगवंताची कृपा*
*एका गृहस्थाच्या मुलाला अनेक वर्षांनी मुलगा झाला. श्रींना हे*
*सांगितल्यावर ते गृहस्थ म्हणाले, “पुढे सगळे चांगले होईल ना ?” त्यावर श्री म्हणाले, "भगवंत जे करतो ती सगळी कृपा आहे म्हटल्यावर त्यात चांगले वाईट कसले ? म्हणजे आपण आपल्या मनासारखे झाले की त्याची कृपा झाली म्हणतो आणि मनाविरूद्ध झाले की कृपा नाही म्हणतो हे चुकीचे आहे. आपल्याला वाटते तसे न होण्यातही त्याची कृपा आहेच. झोपल्यावर*
*रोज सकाळी आपण जागे होतो ही त्याची कृपाच नाही का?"*
*वो नाम कुछ और*
*एकदा कबीराचा दोहा श्रींना वाचून दाखविला,"*
“रामनाम सब कहत है, ठग ठाकूर और चोर । जिस नामसे ध्रुव प्रल्हाद तरे वो नाम कुछ और ।।"
*वाचल्यावर ती. बाबांनी श्रींना विचारले, “वो नाम कुछ और" याचा अर्थ काय घ्यायचा ?* *त्यावर श्री म्हणाले, “नाम तेच राहते, त्यात बदल होत नाही,* *घेणारा 'कुछ और' होतो. मन जसजसे सूक्ष्म होत जाते, तसतशी गुरुच्या अस्तित्वाची जाणीव सतेज होते. नाम घेत असतांना गुरूच्या अस्तित्वाची जाणीव सतत राहिली पाहिजे.'*
*नामाचा झरा*
*श्रीमहाराजांना भेटायला एक शास्त्रीबुवा आले होते. त्यांनी श्रींना*
*विचारले, “परमात्मा सर्व कार्यकारण* *भावाच्या पलीकडे आहे, तो कर्माने कसा प्राप्त होणार, कारण आपण नाम* *घेतो ते कर्मच नाही का ?" त्यावर श्री म्हणाले, “परमात्मा हा नित्यप्राप्तच आहे, तेव्हा त्याची प्राप्ती व्हायला आणखी काही कर्म नकोच. पण आज आपण त्याला विसरलो आहोत म्हणून*
*त्याचे स्मरण केले की पुरे. तुम्हाला भूक लागते. झोप येते यात कर्म कोणते* *घडते ? ही भूक किंवा झोप जशी तुमच्यातून आपोआप येते तसे नामही आतूनच येते. आज तुम्ही बाहेरून नाम घेता म्हणून ते कर्म आहे. ते आतून येऊ* *लागले की कर्म राहत नाहीं. आज आपण बाहेरचे जग आत घेतो आहोत त्या ऐवजी आत जाता आले पाहिजे."* *त्यावर श्री प्रल्हाद महाराज तेथेच होते*
*ते म्हणाले, “झऱ्यातून पाणी येते तसे नाम आतून आले पाहिजे." त्यावर श्री म्हणाले, “ बरोबर आहे, झऱ्यात पाणी असतेच पण त्यावरचे दडपण प्रतिबंध दूर झाल्याखेरीज पाणी येत नाही. तसेच जे नित्यप्राप्त आहे त्यावरचे दडपण दूर केल्यास ते सहजी प्राप्त होऊ शकते. संकलन आनंद पाटील*
No comments:
Post a Comment