हिंदू नूतन वर्षभिनंदन!!
गुढी पाडव्याविषयी सनातन संस्थेने लिहिलेल्या विविध लेखातील माहिती एकत्रित केली आहे.
ब्रह्मध्वज पूजन चैत्र प्रतिपदा अर्थात गुढी पाडवा - जसा हिंदूंचा कुठलाही सण हा मौजमजेचा विषय नाही, तर मांगल्य, पावित्र्य, चैतन्य यांचा आनंदसोहळा आहे, तसाच गुढीपाडवाही आहे. गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया आणि दसरा म्हणजे प्रत्येकी एक अन् कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे अर्धा, असे साडेतीन मुहूर्त आहेत. या साडेतीन मुहूर्तांचे वैशिष्ट्य असे की, इतर दिवशी कोणत्याही शुभकार्यासाठी मुहूर्त पहावा लागतो; या दिवशी मात्र मुहूर्त पहावा लागत नाही. या दिवसांतील कोणतीही घटिका शुभमुहूर्तच असते.
चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास अर्थात गुढीपाडवा साजरा करण्यास *नैसर्गिक*, *ऐतिहासिक* आणि *आध्यात्मिक* कारणे आहेत.
*नैसर्गिक महत्त्व* – वसंत ऋतूच्या प्रारंभाचा दिवस
*ऐतिहासिक महत्त्व* - रामाने वालीचा वध या दिवशी केला, शालिवाहन शक चालू झाल्याचा दिवस
*आध्यात्मिक महत्त्व* - ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो.
बांबू हे सुषुम्ना नाडीचे प्रतीक असून त्यातून शरिरात सर्वत्र चैतन्यशक्ती (कुंडलिनी शक्ती) कार्य करते. तिची आराधना करून आणि ती जागृत होऊन त्याद्वारे कार्य करण्यासाठी तिला आवाहन करणे, यासाठी ही पूजा केली जाते. त्या शक्तीला सजवले जाते; म्हणून बांबूला वस्त्र नेसवले जाते.
गुढीला कडूलिंब का लावतात ? कडूलिंब हा कडू असला, तरी तो गुणकारी आहे. सत्य हेसुद्धा कडू असते. यासाठी गुढीला ते लावतात. हा वनस्पतीचा सत्कार आहे.
गुढीवर उलटा लावलेला कलश (तांब्याचा तांब्या), हा ज्ञानशक्तीचे प्रतीक आहे. तो कळस (शिखर) आहे. ते गाठणे म्हणजे यशस्वी होणे होय.
गुढी सूर्योदयानंतर लगेच उभारावी. बांबू स्वच्छ करून भगव्या, हिरव्या किंवा पिवळ्या रंगाची साडी, गाठी, कडुनिंबाची पाने आणि आंब्याची पाने आणि फुलांचा हार या बांबूला बांधावा. भूमीवर पाट ठेवून कळलेल्या स्थितीत उभी करावी. तांब्याच्या कलशावर स्वस्तिक काढून तो उपडा ठेवावा.
बांबू हे सुषुम्ना नाडीचे प्रतीक असून त्यातून शरिरात सर्वत्र चैतन्यशक्ती (कुंडलिनी शक्ती) कार्य करते. तिची आराधना करून आणि ती जागृत होऊन त्याद्वारे कार्य करण्यासाठी तिला आवाहन करणे, यासाठी ही पूजा केली जाते. त्या शक्तीला सजवले जाते; म्हणून बांबूला वस्त्र नेसवले जाते.
गुढीवर उलटा लावलेला कलश (तांब्याचा तांब्या), हा ज्ञानशक्तीचे प्रतीक आहे. तो कळस (शिखर) आहे. ते गाठणे म्हणजे यशस्वी होणे होय.
गुढीला कडूलिंब का लावतात ? कडूलिंब हा कडू असला, तरी तो गुणकारी आहे. सत्य हेसुद्धा कडू असते. यासाठी गुढीला ते लावतात. हा वनस्पतीचा सत्कार आहे.
कडुनिंबाची फुले, कोवळी पाने, चण्याची भिजलेली डाळ किंवा भिजलेले चणे, मध, जिरे आणि थोडासा हिंग एकत्र मिसळून प्रसाद तयार करावा व तो सर्वांना वाटावा.
कडुलिंबाची कोवळी पाने अणि फुले, मिरे, हिंग, मीठ, कैरी, साखर अन् चिंच हे सर्व साहित्य एकत्र करून ते चांगले वाटावे आणि औषध म्हणून घ्यावे.
जून पानांत शिरा असतात आणि त्यामुळे त्यांच्यातील औषधी गुण अल्प होतो; म्हणून विशेषकरून मिळतील तितकी कोवळी पानेच घ्यावीत.
No comments:
Post a Comment