चिंतन
श्रीराम,
तापत्रय म्हणजे तीन प्रकारचे ताप. आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप, आधिभौतिक ताप. हा आधिभौतिक ताप ईश्वराच्या नियोजनाखाली होत असतात. प्रचंड पावसाने अचानक डोंगर खचतो.. किंवा शेजारची बिल्डिंग पडते.. त्याच्या खाली अनेकजण गाडले जातात आणि दुसऱ्या घराला काही होत नाही! असे कसे?
जेव्हा घडणारी प्रत्येक गोष्ट त्या त्या व्यक्तींच्या प्रारब्धात असल्याने घडत असते.असे लक्षात ठेवले तर देवा, माझ्याच बाबतीत तू का निष्ठूर होतास? असा प्रश्न मनात येणार नाही. माझ्या प्रारब्धात हेच त्याने लिहिले होते.. असे प्रत्येक घडीला म्हणता आले पाहिजे.
दुसऱ्यांच्या नशिबात जर काही वाईट घटना घडली तर आपण पटकन म्हणतो की, तिचे नशीब खोटे, तिच्या प्रारब्धात असे लिहिले असेल. पण स्वतःच्या बाबतीत काही घडले तर मात्र ते पटकन स्वीकारले जात नाही कारण परिस्थिती स्वीकारण्याची मानसिकता नसते. ही मानसिकता नसणे म्हणजे ईश्वराशी शरणागती नसणे होय.
सदाचाराने वागून, निरपेक्ष भावनेने
वागून घडणारी प्रत्येक घटना त्याच्या इच्छेने होत आहे असे स्वीकारणे म्हणजे सद्गुरूंच्या प्रती, ईश्वराप्रती शरणागती आहे असे म्हणता येईल.
||श्रीराम ||
No comments:
Post a Comment