TechRepublic Blogs

Friday, October 31, 2025

तळमळ

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*🌺🙏नामप्रभात 🙏🌺*


*पू. बाबा : पाच मिनिटे का होईना, इतर सर्व काम आणि विचार बाजूला ठेवून निश्चयाने सर्व लक्ष नामाकडे देता आले पाहिजे, म्हणजे मग नामस्मरणात थोडा हुकमीपणा येईल. तसेच आपल्या आड काय येते हे सावधानतेने पहावे म्हणजे मग ते बाजूला काढण्यासाठी उपाय सुचेल. थोडक्यात 'मला ते पाहिजे' ही तळमळ हवी. आज त्याचा अभाव आहे. ही तळमळ निर्माण होण्यासाठी सत्संगती हाच उपाय आहे. सज्जन तुम्हाला मदत करू शकतात.

 ते तुमचे विकार बाजूला करतील पण तुम्हाला ते सहन झाले पाहिजे. विकार आपल्या अंगभूत झालेले असल्याने ते निघतांना फार त्रास होतो; ती तयारी हळूहळू होईल. पण आज साधनात एक किमान पातळी यावयास हवी. मागे जाऊ नये; पाऊल पुढेच पडले पाहिजे. आता साधनाच्याच मागे लागले पाहिजे. नामाच्या आड येणारे विचार खरें वाटतात म्हणून ते खरें असले तरी मला सुखाचे होणार नाहीत. 

मला नामाशिवाय दुसरे कशानेही सुख मिळणार नाही असे मनापासून वाटू लागले तर मन नामात रंगू लागेल. बहिर्मुखी निश्चय सोपा असतो पण अंतर्मुख व्हावयाचा निश्चय कठीण आहे. अशा निश्चयाच्या आड आपणच येत असतो. वास्तविक जगात आपल्यावाचून काहीच अडत नाही. म्हणून जगाची फारशी पर्वा करण्यात अर्थ नाही. श्रीमहाराज म्हणत की जे नामाच्या आड येते त्याची पर्वा करू नये. आता मनाशी सरळ समोरून युद्ध केले पाहिजे.*


*🍁अध्यात्म संवाद🍁*

No comments:

Post a Comment