TechRepublic Blogs

Friday, October 24, 2025

वियोग

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*वियोगाचे दु:ख सुनेसारखे असावे*


       *श्रीमहाराज नेहमी म्हणत की जो माझा झाला त्याने दु:खीकष्टी असू नये नेहमी आनंदात व समाधानात असावे. त्यावर एकदा एका बाईने म्हटले की , " प्रपंचातले हानीचे आणि वियोगाचे काही प्रसंग इतके दारूण असतात की तेव्हा दु:ख केल्याशिवाय राहवतच नाही. मग काय करावे? " त्यावर श्रीमहाराज म्हणाले, " माय , एखादी खाष्ट बाई मेली म्हणजे तिची मुलगीही रडते आणि सूनही रडते. यापुढे आता आपल्याला माहेर कायमचे अंतरले ही धार मुलीच्या रडण्याला असते, तर आता आपल्याला स्वतंत्रपणा लाभेल या जाणिवेची झालर सुनेच्या रडण्याला रहाते. प्रपंचातील नातीगोती , सुखदुःखे , संयोग - वियोग हे पूर्वकर्मानुसार येणारे असून अटळ आहेत आणि तितकेच तात्पुरते आहेत ही जाणीव ज्याला आहे तो त्याचे दु:ख बेतास बातच मानील. ही जाणीव नामस्मरणाने येते आणि दृढ होत जाते; म्हणून सर्वांनी मनापासून नाम घेत जावे. "*

*||श्रीराम जय राम जय जय राम||*

No comments:

Post a Comment