संतांच्या अंगी सद्गुरु होण्याची पात्रता आपोआप येते. सदगुरुंचे मुख्य कार्य म्हणजे त्यांच्याकडे येणाऱ्या माणसांच्या अंतर्यामी क्रांती घडवून आणणे. माणसांची वासना दृश्यांमध्ये गुंतलेली असते. ती आंत वळवून हृदयस्थ ईश्वराच्या चरणी स्थिर करण्याचा प्रक्रियेला ईश्वरास शरण जाणे असे म्हणतात.
ज्याच्या त्याच्या पूर्वकर्मां प्रमाणे प्रत्येक माणसाची परिस्थिती निराळी असते. परंतु परिस्थिती कशीही असू दे, शरणांगत होण्याची कला साधली की माणूस शांत तृप्त व निर्भय जीवन जगतो. साधकांच्या जीवनामध्ये ईश्वराला अथवा सद्गुरुला शरणांगत होण्याला अनन्य साधारण महत्व दिले जाते.
त्यामुळे साधकाच्या साधनांमध्ये शरण जाण्याचा संकल्पनेला प्राथमिक स्थान असते. पण सिद्ध अवस्था भोगणाऱ्या संतांना देखील शरणागतीचा दिव्यपणा पदोपदी जाणवतो.
No comments:
Post a Comment