चिंतन
श्रीराम,
मानवी जीवनात प्रपंच व परमार्थ म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू! प्रपंच व परमार्थ समांतर चालविण्यामध्ये जीवनाची सार्थकता आहे. म्हणून समर्थ सांगतात - आधी प्रपंच करावा नेटका |मग घ्यावे परमार्थ विवेका |१२.१.१
प्रपंचात जसे ध्येय ठरवले जाते, त्याप्रमाणे आपल्या आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी सच्चिदानंद पदवी प्राप्त करण्याचे लक्ष्य सतत समोर ठेवावे असे संत सांगतात.
त्यासाठी योग्य सद्गुरूंचे मार्गदर्शन लाभणे फार महत्वाचे असते. ईश्वरी कृपेनेच योग्य सद्गुरूंची भेट होते. मग आपल्या हातात असलेले आपले आयुष्य आणि अभ्यासाला लागणारा वेळ..
ह्याचा ताळा घालून ताबडतोब अभ्यासाला सुरुवात करावी लागते. कारण आपले आयुष्य किती आहे ते कोणालाच माहीत नसते. समर्थ मनाच्या श्लोकात म्हणतात - चिरंजीव हे सर्व मानिताती |अकस्मात सांडूनिया सर्व जाती ||१५||
||श्रीराम ||
No comments:
Post a Comment