TechRepublic Blogs

Friday, October 25, 2024

सियालकोट

 *मतदान न करण्याची शिक्षा*

            *सियालकोट* 

*लम्होने खता की थी, सदियों ने सजा पाई l*

 नुकतेच पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे आणि आता लगेच दुसऱ्या टप्प्याचे मतदान समोर उभे आहे. नंतर आणखी पाच टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात कमी मतदान झाले म्हणून इतिहासातील एका घटनेची आठवण करून द्यावीशी वाटते. मतदान केले नाही तर त्याची शिक्षा किती पिढ्यांनी भोगली आणि देशाने त्याची किती मोठी किंमत मोजली हे या घटनेवरून लक्षात येईल. 

ही घटना आहे १९४६ मधील, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व फाळणीच्या अगोदरची. सियालकोट, पाकिस्तान मधील पंजाब प्रांतचा एक जिल्हा. लाहोर पासून याचे अंतर १३५ किलोमीटर आहे आणि जम्मू पासून फक्त ४२ किलोमीटर. गोपीनाथ बारडोलोई हे आसाम मधील आणि देशाचे मोठे नेते होते. 

सियालकोट हे फाळणीच्या वेळी भारतामध्ये राहावे यासाठी ते प्रयत्नशील होते. सियालकोट हा त्यावेळी हिंदू बहुल प्रदेश होता. तरीही असे ठरले की जनमत संग्रह घेऊन निकालाच्या आधारावर सियालकोट भारतात राहील का पाकिस्तानात जाईल हे ठरवायचे होते. 

जनमत संग्रहाची तारीख, वेळ आणि प्रक्रिया सर्व ठरले. मतदानाचा दिवस उजाडला. सकाळपासून मतदान सुरू झाले. मुसलमान सर्वात आधी सकाळी लवकर उठून मतदानासाठी रांगा लावून मतदान करू लागले. मोठ्या रांगा लागल्या. हिंदू निवांत उठले. जेवण वगैरे करून दुपारी मतदानासाठी आले. 

बघतात तर समोर मोठ्या रांगा लागल्या होत्या. काही हिंदू रांगा बघूनच मतदान न करता घरी निघून गेले. काही हिंदू रांगेत उभे राहून कंटाळून घरी परत निघून गेले. 

मतदानाचा निकाल आला. आणि ५५,००० मतांनी सियालकोट पाकिस्तानात सामील होण्याचा प्रस्ताव पास झाला. कारण एक लाख हिंदूंनी मतदान केले नाही. १९४१ च्या जनगणनेनुसार सियालकोटची एकूण हिंदू संख्या दोन लाख एकतीस हजार होती. पैकी एक लाख हिंदूंनी मतदान केले नाही. मुसलमान संख्येने कमी असूनही सर्वांनी मतदान केल्यामुळे सियालकोट पाकिस्तानात सामील करायचे ठरले गेले .

यानंतर १६ ऑगस्ट १९४६ चा काळा दिवस उजाडला. जिन्नांनी "डायरेक्ट ॲक्शनची" घोषणा केली. त्याचा प्रहार सियालकोट वर पण झाला. मोठ्या प्रमाणावर हिंदू स्त्रियांची अब्रू लुटून हत्या करण्यात आली आणि हिंदू मुले आणि पुरुषांची कत्तल करण्यात आली. मतदानाच्या दिवशी जे आराम करून घरी विश्रांती घेत राहिले ते कायमच्या विश्रांतीसाठी देवाघरी पाठविले गेले.

त्यानंतर १९५१ च्या जनगणनेनुसार सियालकोटची हिंदू संख्या केवळ दहा हजार राहिली. सन २०१७ मधे ही संख्या आता फक्त पाचशे एवढी राहिली आहे. आज सियालकोट मधे एक तरी हिंदू राहिला असेल असे वाटत नाही. १९४६ ला जर हिंदूंनी मतदान केले असते तर सियालकोट भारतात राहिला असता आणि सर्व हिंदू पिढ्या दिमाखात राहिल्या असत्या. आपले एक मत न देण्याने काय होते याचे इतिहासातील सर्वात मोठे उदाहरण म्हणजे सियालकोट. हिंदू, त्यातल्या त्यात शहरी हिंदू, हा राष्ट्रीय निष्ठेला कमी जागरूक आहे. शहरी हिंदू मतदानाच्या दिवशी सुट्टी समजून मजेत दिवस घालवतो आणि मतदान न करता सर्व कामे सरकारने करावीत ही अपेक्षा ठेवतो. या उलट ग्रामीण लोकसंख्येने अशिक्षित असून सुद्धा मतदान करून लोकशाही अजून जिवंत ठेवली आहे. अजूनही जर प्रत्येक हिंदू मतदाता जागरूक होणार नसेल तर भारताचे सियालकोट होण्याला उशीर लागणार नाही. आणि इथून पुढील हिंदू पिढींना त्याची फार मोठी किंमत चुकवावी लागेल हे इतिहास आणि सियालकोटच्या घटनेने दाखवून दिले आहे.

*जागे व्हा आणि मतदान अवश्य करा*


*सागर आफळे*

No comments:

Post a Comment