श्रीराम समर्थ
*रामतनय*
औंधचे मार्तंडबुवा गोंधळी हे श्रींचे परमभक्त होते. जातीनें गोंधळी असून त्यांची भाषा शुद्ध व रसाळ होती. त्यांचे पूर्ण नाव *मार्तंड रामचंद्र गोंधळी* असे असून राजे बाळासाहेब औंधकर यांच्याजवळ ते किर्तन शिकले. थोरल्या राममंदिरात ते आपल्या हयातीपर्यंत कीर्तन करीत असत. त्यांचे पाठांतर खूप असून काव्य करण्याकडे त्यांची प्रवृत्ति होती. *'धन्य जगी या गुरुवर्य हे मारुति अवतार'* हे प्रसिद्ध पद श्री असताना त्यांनी रचले, व त्याचा शेवट *'रामतनय हा चरणा वंदी जोडुनिया कर'* असा केला आहे.
*********
संदर्भः चेतन्यराम ह्या स्मरणीकेतील कृष्णाजी गोपाळ मोकाशी यांच्या लेखातून पान ६९
संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन
No comments:
Post a Comment