TechRepublic Blogs

Thursday, October 10, 2024

तापा

 चिंतन 

              श्रीराम,

          सगळ्या तापांचा त्रास जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत सगळ्यांना होणारच आहे. हे ताप म्हणजे आपल्या प्रपंचातील मार्गावरचे न टाळता येणारे खाचखळगे, खड्डे असतात. सर्वोत्कृष्ट असलेली नामस्मरणाची गाडी जर आपल्या कडे असेल तर कितीही खड्डे वा खराब रस्ता आला तरी त्यांचा त्रास होत नाही. कारण भगवंताचे नाम आपल्याला वरच्या वर झेलत असते. ती गाडी चालवण्याची कला योग्य गुरुंकडून शिकली की मार्गात कितीही खड्डे असले तरी त्यावरून गाडी सफाईदार चालवता येते.

                     प्रश्न असा येतो की नामस्मरणाचे महत्त्व कळते, समजते पण आचरणात मात्र आणता येत नाही. मग नामस्मरणात मन एकाग्र होत नसेल, त्याची गोडी लागत नसेल तर संत आपल्याला मानसपूजा करावी असे सांगतात. त्याने मन एकाग्र व्हायला मदत होते.

                ईश्वराजवळ जाण्यासाठी 'मानसपूजा' हा भक्तीमार्गातील खूप महत्वाचा पूल आहे.

                          ||श्रीराम ||

No comments:

Post a Comment