श्रीराम,
हजारो मैल लांब असलेल्या व्यक्तींच्या मनातील विचार ओळखण्यासाठी किंवा उर्जा पाठवण्यासाठी आपण प्रयत्न करतो पण 'रिता ठाव या राघवेवीण नाही 'असा सृष्टीतील सूक्ष्मातील सूक्ष्म अणुरेणू मध्ये असलेला आनंदस्वरूप भगवंत माझ्याही अंतर्यामी आहे. त्याला कनेक्ट होण्यासाठी कुठेही हजारो मैल लांब न जाता फक्त अंतर्मुख व्हायचे आहे व त्यासाठीच हजारो वर्षापूर्वी आपल्या संतांनी मानसपूजा सांगितली आहे.
अंतर्यामी असलेल्या भगवंताशी टेलीपथीने जुळल्यावर अनंत फायदे होतात. अगदी थोडक्यात आणि महत्वाचे म्हणजे १)त्याचे सत् चित् आनंद स्वरूप जे आपल्या आतच आहे ते प्रगट होते. २)तो तर अखंड शाश्वत चैतन्य स्वरूप आहे, त्याच्या पुढे आपण त्याचा एक सूक्ष्म अंश आहोत. त्याची उर्जा आपल्या अंतरी आहेच. ती सतत प्रगट होते. ३)प्रेम स्वरूप भगवंताप्रमाणे आपल्या अंतर्यामी प्रेम प्रगट होते. ४)भक्तीच्या पोटी ज्ञान असते.. म्हणून ईश्वराची भक्ती करुन ज्ञान प्रगट होते.
||श्रीराम ||
No comments:
Post a Comment