TechRepublic Blogs

Monday, October 28, 2024

विरक्ती

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*विवेक खरा तो की ज्याने विरक्ती निर्माण होते.विरक्ती निर्माण होते याचा अर्थ असा की विरक्ती त्याची गृहिणी बनल्यावर त्याच्या बाकीच्या जीवनाचा जो क्रम आहे तो गृहस्थाला लागू असाच असला पाहीजे.हा परमार्थ मार्ग आहे.विवेकाशिवाय विरक्ती शक्य नाही.उगीच उपासतापास,पोथ्यापुराणं वाचणं याने शरीराला त्रास होईल व मुख्य जे हरीकथानिरुपण ते दूरच राहील.परमार्थ म्हणजे सगळा सुक्ष्माचा खेळ आहे.नामाने आपण सुक्ष्मात जातो.पोथी,प्रार्थना,वैगरेंनी पार्श्वभूमी तयार होईल पण त्यालापण काही लिमीट आहे की नाही?हे समजत नाही म्हणूनच संतांना नामाला "तू घोटघोटकर पी"असं नाईलाजास्तव म्हणावं लागतं.नामाचं महत्व कळल्यावर तरी इतर गोष्टी न करता केवळ नामालाच लागावं.एकदा का विरक्ती आली ना की या जीवनात काही अर्थ नाही असं वाटलं पाहीजे.*

*संदर्भ - बाबा बेलसरे*

*ज्ञानेश्वरी प्रवचने*

No comments:

Post a Comment