💞
_*#मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याचा गंध मनाला, शरीराला प्रसन्न करून जातो.*_
_सहवासातील माणसाचं देखील असंच असतं._
_शरीराची सुंदरता वया बरोबर संपते, तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहाते. शरीराला वय असतं, मनाला ते कधीच नसतं..!_
_शेवटी काय, आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो, शरीर तर निमित्त मात्र असतं._
_माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा, आणि विनयशीलता असेल, तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते..!_
_म्हणूनच बाहेर लक्ष दिव्याची सुंदर आरास असूनही, देवघरातील समईच्या तेजापुढं आपण नतमस्तक होतो..!_
_आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं...!!_
_आपल्या आवडत्या माणसाचं आपल्या सोबत असणं, ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई..!_
_ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही._
_आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे...?_
_*नशिबानं कधी भेटलीच तर हळुवार जतन करून ठेवावीत..!*_
_*जपलेले ऋणानुबंध असेच पुढेही जपूया...!!*_. 🌹
🙏
No comments:
Post a Comment