TechRepublic Blogs

Saturday, August 31, 2024

देहबुद्धी

 एकदा इच्छामरण या संदर्भात पू.श्री.गोंदवलेकर महाराजांच्या शिष्य मंडळीत चर्चा चालू होती. तेव्हा श्री.महाराज म्हणाले "निसर्गक्रम झुगारून, मर्जी लागेल तेव्हा मी देह सोडीन असे म्हणणारा हा इच्छामरणी नव्हे. ज्याने आपली सर्व इच्छा  भगवांताच्या इच्छेत विलीन करून टाकली असाच माणूस इच्छामरणी म्हणावा. भगवंत त्याला बोलावतो तेव्हा तीच आपलीही इच्छा समजून तो आनंदाने देह सोडतो. खरे म्हणजे ज्या क्षणाला गुरुकृपेने देहबुद्धी पूर्णपणे नष्ट होते त्या क्षणालाच तो देहापासून पूर्ण निराळा झालेला असतो. ' आपुले मरण पाहिले म्या डोळां ' असे पू. श्री.तुकाराम महाराज सांगतात ते हेच. देहबुद्धी गेली की त्याला देहाची आसक्तिही रहात नाही. आणि त्याची स्वतंत्र अशी काही इच्छाही उरत नाही. म्हणजे तो इच्छामरणी होतो.  हे नामस्मरणाने साधते. म्हणून मी तुम्हाला एवढ्या आग्रहाने नाम घ्यायला सांगतो."

No comments:

Post a Comment