TechRepublic Blogs

Friday, August 23, 2024

समीकरण

 

                 श्रीराम,

        परमार्थात एक समीकरण आहे. देह म्हणजे दुःख आणि आत्मा म्हणजे आनंद. मी म्हणजे देह असे म्हटले की दुःख अपरिहार्यपणे येतेच. तर मी म्हणजे आत्मा असे म्हटले असता आनंदाची प्राप्ती होते. कारण हे एकमेकांना सोडून कधीच रहात नाही. कोणताही आजार हा देहाला होतो.. आणि आजार झाला की दुःख होतेच. पण मी म्हणजे आत्मा अशी आत्मबुद्धी दृढ केली की देहाच्या आजाराचे दुःख होत नाही. उदा - : एखादा पदार्थ तिखट झाला असेल तर आपण म्हणतो.. पदार्थ खूप तिखट आहे, मी खाऊ शकत नाही. पण जीभेला तिखट लागत आहे. मला नाही.

                  थोडक्यात मी देह आहे ही धारणा जेवढी दृढ असेल तेवढे आध्यात्मिक ताप जास्त होतात म्हणून "देह दुःख ते सुख मानीत जावे" असे समर्थ सांगतात.

            आधिभौतिक ताप कमी होण्यासाठी जग मिथ्या आहे ही धारणा दृढ करावयास हवी. आधिदैविक तापातून सुटण्यासाठी माणसांनी नीतीने, परोपकारी वृत्तीने वागावे असा सल्ला समर्थ देतात.

                        भक्तीमार्गात त्रिविध ताप कमी होत नाहीत तर 'मी म्हणजे आत्मा' अशा आत्मबुद्धीने आणि ईश्वर शरणागतीने या तापांच्या मुळे जीवाला जो त्रास होतो तो त्रास किंवा त्याचे दुःख कमी होते असे संत सांगतात.

                       ||श्रीराम ||

No comments:

Post a Comment