पु.योगी अरविंद यांच्या शिष्या पु.मदर त्यांच्या "दि माईंड ऑफ दि सेल्स" या पुस्तकात म्हणतात की मी सदैव नामतच राहते. काल मी चालत असताना नामाने मला सर्व बाजूंनी व्यापले. माझ्या सभोवती परमात्मा होता. कोणत्याही समस्या राहिल्या नव्हत्या केवळ त्याचे अस्तित्व होते. दुसऱ्या उताऱ्यात त्या म्हणतात की मनावर ताबा न मिळवता केवळ शरीरावर ताबा मिळवू म्हणणाऱ्यांना माझे आव्हान आहे की त्यांनी तसे करून दाखवावे. एकदा पु.श्री.बेलसरे यांनी श्री.गोंदवलेकर महाराजांना विचारले की योगमार्गाचे आचरण करू का ? श्री.महाराज म्हणाले तुम्हाला विनाकारण कष्ट करायची हौस आहे का ? श्री. बेलसरे म्हणाले "मी सर्व मार्ग चोखाळले.
नामस्मरणासारखा मार्ग नाही. योगमार्गात इंद्रियांवर ताबा मिळवून मन ताब्यात आणतात. भक्तिमार्गात मन ताब्यात आणून त्या द्वारे इंद्रियजय केला जातो. मन हे देखील इंद्रियच आहे. त्यामुळे जडाचे नियम त्यालाही लागू आहेत." भक्तिमार्गात सिद्धीचे टप्पे केव्हा येऊन गेले याचा साधकाला पत्ताच लागत नाही. त्यामुळे साधक घसरण्याची भीती कमी असते.
No comments:
Post a Comment