TechRepublic Blogs

Tuesday, August 6, 2024

देहबुद्धी ते आत्मबुद्धी

 चिंतन 

            श्रीराम,

     थोडक्यात, हे त्रिविध ताप जाणून घेतल्यावर आपल्या लक्षात येईल की, होणारे प्रत्येक दुःख हे 'मी म्हणजे देह' असे समजल्याने होत असते. भगवंताच्या चरणी अनन्यभावे शरण गेलो तर तो आपला उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. प्रभू रामचंद्र, श्रीकृष्ण किंवा आपले आराध्यदैवत नेहमीच शरण आलेल्या आपल्या भक्ताचे रक्षण करतात. पण मग आपण त्यांना अनन्य भावे शरण जातो का? हे तपासून बघायला हवे. अनन्य भावे शरण म्हणजे माझ्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा हिशोब मी ईश्वराला देत आहे का? त्याने गीतेत जसे कर्म सांगितले आहे तसे स्वधर्माचे पालन करून कर्म करीत आहे का? कोणत्याही फलाची अपेक्षा न ठेवता त्याला अर्पण करत आहे का? अशा अनेक गोष्टी दर सेकंदाला तपासणे आणि ईश्वराच्या शक्तीवर दृढ श्रद्धा व विश्वास असणे म्हणजे शरणागती असा एक अर्थ लावता येईल.

                   जेव्हा संतांना अपेक्षित असे आपले सदाचारी वागणे असेल तेव्हा देहबुद्धी ते आत्मबुद्धी होण्यास वेळ लागणार नाही.. अशी ग्वाही स्वतः संत आपल्याला वेळोवेळी देतात.

                            ||श्रीराम ||

No comments:

Post a Comment