TechRepublic Blogs

Wednesday, August 28, 2024

ब्राह्मण्याधाय कर्माणी

 ब्राह्मण्याधाय कर्माणी म्हणजे सर्व कर्मे ब्रह्माच्या ठिकाणी पोचायची आहेत म्हणजे सर्व कर्मे मूळच्या ठिकाणी पोचली पाहिजेत. म्हणजे त्यांच्या फळाची अपेक्षा आशा करण्याची गोष्टच नाही. अस असल्यामुळे तो साक्षीभावाने कर्म  करतो मग त्या कर्माचं पापपुण्य त्याला लागत नाही. तो या कर्माच्या फळापासून पूर्णपणे अलिप्त असतो. 

सरकारी नोकरी करणाऱ्यांना या अलिप्ततेची पूर्ण कल्पना असते. वरून आदेश आला की कितीही मनाविरुद्ध असु दे तरी आदेश पाळावा लागतो आणि त्याचं कर्तेपण त्याच्याजवळ नसत. तसं  आपल्या गुरूंबद्धल भगवंतांबद्धल वाटलं पाहिजे . 

आज हे कर्म आहे ना तुझी इच्छा, तुझा हुकूम आहे ना , तुझ्या मनात आहे ना मग तसं होऊ दे. मग प्रपंचात अमक झालं तर प्रपंच चांगला पण ते न झालं तर प्रपंच वाईट हे खरं नाही. श्री.गोंदवलेकर महाराजांनी एक दृष्टांत दिला . एक शिष्य गुरूंच्या उपासनेला जायचा.

 उपासना झाल्यावर प्रसाद वाटतात तो सर्वसाधारण गोड असतो. पण एकदा प्रसादात कडू बदाम आला .या कडू बदमाने शिष्य नाराज झाला. खरं असं आहे आपल्या गुरूचा प्रसाद आहे ना मग इतके दिवस गोड प्रसाद खाल्ला तर एक दिवस कडू बदाम खाल्ला तर का वाईट वाटावं ? आज पर्यंत चांगली परिस्थिती होती आज हा प्रसंग आला तर असू द्या, काही हरकत नाही हे बरोबर आहे .

 हे मनाला शिकवण हा परमार्थ आहे. तू ठेवशील तसा मी राहीन. आपल्या मनाला शिकवावे की गुरूच्या हातात सत्ता आहे. तो आपल्याला माकड नाचवतात तसं नाचवू शकतो. 

आपल्या प्रपंचात आपण कोणत्या प्रकारे रहावं याचा सगळं हिशोब त्याच्याकडे असतो. कितीही उड्या मारा, प्रयत्न करा पण या प्रयत्नांना फळ तेव्हाच मिळेल जेव्हा गुरूंना वाटेल की आता याला थोडं दिलं पाहिजे. आपण ही जाणीव ठेवणे हा परमार्थ आहे.

No comments:

Post a Comment