*गुरुकृपेचा दीप*
(*सहज बोलणे हितोपदेश:* संकलन आनंद पाटील)
*इंदूरच्या भैय्यासाहेब मोडकांमुळे श्रीब्रह्मानंदांना श्रींचा लाभ झाला. म्हणून ब्रह्मानंदांचे त्यांच्यावर विशेष प्रेम होते. १९१७ साली भैय्यासाहेबांनामोठ्या आग्रहाने ब्रह्मानंदांनी रामनवमीसाठी इंदूरहून बेलधडीला मुद्दाम बोलावून घेतले. भैय्यासाहेबांना स्वतंत्र खोली राहण्यास दिली. एक महिना*
*भैय्यासाहेब तेथे राहिले. संध्याकाळी ब्रह्मानंद* *भैय्यासाहेबांच्या खोलीवर जायचे व तंबाखू खायचे. एके दिवशी ब्रह्मानंदांना येण्यास उशीर झाला. आल्याबरोबर भैय्यासाहेबांनी त्यांना आलिंगन दिले व केविलवाणेपणाने म्हणाले,*
*तुम्ही महाराजांकडे आमच्या मागून आलात पण आपले काम करून घेतलेत, आम्ही मात्र तसेच राहिलो.” हे ऐकून ब्रह्मानंद* *म्हणाले, “आधी तंबाखू काढा.” अंधार झाल्याने भैय्यासाहेब चंची शोधू लागले. चंची कोनाड्यात* *काही सापडेना. इतक्यात कोणीतरी खोलीत कंदिल* *आणला. एका कोनाड्यात ठेवलेली चंची लगेच सापडली. श्रीब्रह्मानंद म्हणाले,* *“भैय्यासाहेब, हे बघा तुम्हीच ठेवलेली चंची तुम्हाला सापडली नाही, पण दिवा आल्याबरोबर लगेच सापडली. परमार्थात अगदी तसेच आहे. गुरुकृपा झाली की आपले आपल्याला*
*आपल्यापाशीच सापडते. तुम्ही काळजी करू नका. महाराज तुमच्यावर कृपा करतील." भैय्यासाहेबांचा जीव शांत झाला*.
No comments:
Post a Comment