योगवासिष्ठात एक सुंदर कल्पना आहे. समुद्रात एकसारखे तरंग येतात, लाटा येतात. त्या तरंगामध्ये काटक्या, लाकडाचे तुकडे असतात. काही वेळा त्या काटक्या लाटे बरोबर एकत्र येतात आणि दुसरी लाट आली की पुन्हा त्या वेगळ्या होतात. जशा लाटे मुळे काटक्या एकत्र होतात व दुसऱ्या लाटे बरोबर वेगळ्या होतात तसंच माणसांच पण एकात्रपणा असतो. कधीतरी माणसं एकत्र येतात आणि कधी ती वेगळं होतात ते कळत नाही. असं का याचे उत्तर नाही. एक जर असेल तर प्रपंचात आपल्या इच्छा तृप्त होत नाहीत. नवीन इच्छा निर्माण होतात. त्यातून कटकट निर्माण होते. जर साधक स्थितप्रज्ञ असेल, म्हणजे असं असलं तरी ठिक तसं असलं तरी ठिक या पद्धतीने जो मनातील वासना सोडतो तो साधक. याला स्वीकार म्हणतात. भक्तराज काय म्हणतो " तू ठेवशील तसा, तुझ्या इच्छेने मी राहीन." यालाच पू.श्री.स्वामी रामतीर्थ म्हणतात " या युं भी वाहवा हैं और वो भी वाहवा है." हे अत्यंत कठीण आहे. दुःखाचे मूळ तिथे आहे की माझ्या मनासारखं व्हावे. मग माझ्या मनातील इच्छा जात नाही. त्याला पर्याय प्रार्थना श्री.महाराजांना , सद्गुरूंना म्हणावे " माझ्या मनात (इच्छा) असे आहे , आपण हे करा, पण आपल्या मनात नसेल तर करू नका. कारण माझ्या मनातलं जे आहे ते माझ्या हिताचे होईल हे मला माहीत नाही. पण हे मला आपणांस सांगितल्या शिवाय राहवत नाही म्हणून सांगतो." याचाच अर्थ नामस्मरण आहे.
TechRepublic Blogs
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment