TechRepublic Blogs

Wednesday, August 21, 2024

गोंधळ

 *सहज बोलणे हितोपदेश*

*वाचन - गोंधळ*


*श्रीमहाराज निरूपणास बसले म्हणजे एक वयस्कर माणूस तेथे ऐकायला येऊन बसे. असे काही दिवस झाल्यावर त्या इसमाने श्रीना आपल्या घरी नेले व आपल्या ग्रंथसंग्रहातील विविध आध्यात्मिक विषयांवरील पुस्तके व विषय आणि लेखकांप्रमाणे त्याची वर्गवारी केलेल्या वह्या दाखविल्या. त्यावर श्री म्हणाले, “तुमचा हा व्यासंग फार चांगला आहे.*

*पण मला एक शंका आहे, तुमच्या विविध पुस्तकांत पुष्कळ परस्पर विरोधी मते असलेली पुस्तके* *आहेत. त्यातून तुमचे स्वतःचे असे निश्चित काय मत झाले ?" त्यावर तो गृहस्थ गोंधळला व म्हणाला, “महाराज, ज्यावेळी ज्याचे पुस्तक वाचावे त्यावेळी ते खरे वाटते परंतु मागाहून याउलट दुसरे कोणाचे वाचले तर तेही खरे वाटते. त्यामुळे खरं म्हणजे माझाच गोंधळ झाला आहे, त्याला काय करावे?" त्यावर श्रींनी त्यांचे वय विचारले, तेव्हा*

*ने ७५ वर्षाचे असल्याचे त्यांनी* *सांगितले त्यावर श्री म्हणाले, “सर्व पुस्तके वाचून तुम्ही फक्त गोंधळ पदरात पाडून घेतला.* *आता हा गोंधळ जाऊन तुमचे निश्चित मत केव्हा होणार? व मग हातून कृती केव्हा घडणार? मग एवढी पुस्तके वाचून तुमच्या पदरात काय पडले ? माझे एक बरे आहे, मी पुस्तके न वाचल्याने माझा गोंधळ तरी झालेला नाही. माझ्या गुरूने मला दिलेले नाम मी घट्ट धरून ठेवल्याने माझे कल्याण झाले आहे*

*व मी आनंदात आहे." त्या गृहस्थाचे ६ महिन्यांनी निधन झाल्याचे कळल्याने श्रींना वाईट वाटले. श्री म्हणाले, “शहाण्या माणसाने फार वाचून गोंधळात पडू नये. गुरूंना शरण जाऊन त्यांनी दिलेले नाम श्रद्धेने घेत राहावे हाच समाधानाचा मार्ग आहे."*

*"परस्पर विरोधी वाचन हेच* *असमाधानाचे कारण"*

*निःशंक होउनि गुरुवरी ठेवावा विश्वास l*

*नित्यनेमी घ्यावा नामाचा श्वास ll*

*जय जय रघुवीर समर्थ:संकलन आनंद पाटील*

No comments:

Post a Comment