*मनःशांती*.
*साधकाने समाजात वावरत असताना नींद आचरण टाळावे आणि वंद्य आचरण भावे म्हणजे मनापासून करावे. साधनेत गढून गेला असताना समाजातील काही लौकीक व्यवहार सांभाळू शकत नाही, तेव्हा लोकांनी त्याला नावं ठेवल्यास त्याने पर्वा करू नये.*
*वंद्य भावे करावे असे समर्थ म्हणतात, तेव्हा त्याचा अर्थ चांगले वागणे नाईलाजास्त्व नसावे, श्रद्धपूर्वक असावे. चांगले वागण्याची कृती तयार व्हायला पाहिजे. जीवनमूल्य ही*
*जीवनपेक्षा मोठी आहे. संस्कार हा क्षणभंगुर सुखापेक्षा थोर आहे.*
*एकदा कुंतीने युधिष्ठराला* *विचारले आपण एवढे चांगले वागतो तरी आपल्या वाट्याला* *वनवास आला. कौरव एवढे दुराचारी आहेत तरी ते*
*वैभववात लोळत आहेत. तेव्हा युधिष्टर म्हणाला," काही लाभ होणार म्हणून चांगले वागायचे असते हे*
*आजच मला तुझ्याकडून कळले. चांगले वागणे हा संस्कार आहे मग त्यासाठी* *कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल असे*
*मी समजतो". साधकाने प्रयत्नच्या आहारी न जाता वेळप्रसंगी थोडा त्रास सहन करून श्रेयस कर्मच निवडावे. येथे वंद्य म्हणजे श्रेयस आणि निंद्य म्हणजे प्रेयस.सत्य हे जीवनापेक्षा मोठे आहे. चांगले संस्कार*
*समाजामध्ये टिकवून ठेवण्याची जबाबदारी साधकाने निर्धारपूर्वक पार पाडावी. तेंव्हा माणसाने श्रेयस स्तर निवडून प्रेममय आणि शांत जीवन जगावे.
संकलन आनंद पाटील*
No comments:
Post a Comment