TechRepublic Blogs

Monday, August 18, 2025

आत्मानात्म

 

           श्रीराम,

     ब्रह्मानंदी लागली टाळी |तेथे देहाते कोण सांभाळी|

अशी संतांची रोकडी प्रचिती आहे. या उलट आमचे असते. आम्ही उभ्या आयुष्यात सर्वाधिक काळजी स्वतःच्या देहाची घेतो. त्यालाच फक्त अग्रक्रम, बाकी सर्व गौण. संत वर्णन करतात ते आनंदाचे साम्राज्य कसे असेल ह्याचे साधे कुतूहल ही आमच्या मनात उमटत नाही. धावपट्टीवरून सुसाट प्रस्थान करणारे विमान हे भूमीवरचे सर्व काही सोडून थेट अंतराळात झेपावते आणि ढगांच्या ही वरती पोचून विहरत प्रवास करते.

              तसेच आत्मानात्म, सारासार विवेकाने विषयांच्या पलीकडे आणि देहभानाच्या पलीकडे पोहचू शकल्यास एक विलक्षण तटस्थ, प्रसन्न आणि आनंदमय साम्राज्यात प्रवेश करता येतो. प्रगाढ शांतीची स्तब्धता, स्थितप्रज्ञता फक्त सद्गुरूंच्या कृपाशिर्वादाने प्राप्त होते.

                    ||श्रीराम ||

No comments:

Post a Comment