प्रसिद्ध गायक पं. अब्दुल करीम खान म्हणयाचे मी सुरांना गोंजारतो. त्यांच्याकडे गायन शिकायला जाणारे एक जण श्री.बेलसरे यांना म्हणाले की मला सुद्धा नामाला गोंजारावस वाटते. किती रम्य कल्पना आहे. हे नामाचे प्रेम आले तरच गोंजारणे शक्य आहे. लहान मुलाला आई जशी गोंजारते तसं. हे प्रेम असत. गोंजारण्याच्या क्रियेमध्ये आत सौंदर्याचे भान आहे. त्यात निरागसता आणि सहजता आहे. त्यात रसमयता आहे. पु.श्री.तात्यासाहेब केतकर सांगायचे की श्रीमहाराजांकडे गेलं आणि त्यांनी पाठीवरून हात फिरवला की शरीरावर रोमांच यायचे. म्हणजे गुरु तुम्हाला गोंजारतात. पण त्यासाठी निरागस झालं पाहिजे. जिथे अहंकार आहे तिथे निरागसता शक्य नाही. मूल मोठं होऊ लागलं की त्याचा अहंकार वाढू लागतो आणि त्यामुळे त्याची निरागसता नाहीशी होते. श्री.गोदवलेकर महाराज म्हणाले की कमी दिवसाचे मूल जसं कापसात गुंडाळून ठेऊन सांभाळतात तशी मी लोकांची अंतःकरण सांभाळली. माणूस हा चांगल्यावाईटाच मिश्रण आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले खळांची व्यंकटी सांडो.
TechRepublic Blogs
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment