TechRepublic Blogs

Friday, August 8, 2025

आत्मानात्म

 

            श्रीराम,

             आपण सर्वांशी चांगले वागतो ते आपल्यावर झालेले संस्कार आहेत पण आपण चांगले वागूनही काहीजण आपल्याशी वाईट वागतात हे त्यांच्यावर झालेले आहेत म्हणून तिथे दुर्लक्ष करणे हे फार महत्त्वाचे असते. क्रियेवर प्रतिक्रिया देण्यातच आपले आयुष्य संपते.

           मिळालेले सुख उपभोगायचं ते मिरवत नाही बसायचं. प्रत्येक दुःख आणि यातना ही भोगल्यावाचून समजू शकत नाही असे मुळीच नाही. इतरांचे क्लेश, व्यथा आणि दुःखही समजून घेता येतात. मानवी दुःखाचे अनंत प्रकार आहेत त्यात व्याधीच्या यातना, दारिद्र्य, वैफल्य, अपमानशल्य त्यांची तडफड, निराधार बनल्याची त्यांची जीवघेणी जाणीव आणि सर्वात दारूण दुःख म्हणजे मृत्यू!

                 ह्या सगळ्यात सुख किंवा सौख्य म्हणजे काय? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. सौख्य हे उपभोगात आहे की त्यागात? कित्येकदा ज्यात आधी सुख वाटते त्याचे रुपांतर लौकरच दुःखात होऊन बसते. मग सुखरूप होणे म्हणजे काय? यावर सद्गुरू सांगतात - सारासार किंवा आत्मानात्म विवेकाने सुखरूप होणे म्हणजे काय? हे समजून घेता येते.

                          ||श्रीराम ||

No comments:

Post a Comment