हठयोगामध्ये जसे योगक्रियांचे शरीरावर परिणाम होतात तसे नामस्मरणही बरेच होऊ लागले की त्याचे शरीरावर परिणाम होतात. मुख्यतः हे परिणाम आधी नसांवर होतात. त्या पुरेशा बळकट नसतात त्यामुळे त्यांचा शरीरावर परिणाम दिसू लागतो. जपाचा आणखी एक परिणाम असा की काही वेळा बराच वेळ जप झाल्या नंतर, एका साधकाला मीठ खावे, लोणचे खावे असे वाटू लागले, तर जपा मध्ये प्रेम आले तर गोड पदार्थ ही नकोसा होतो. याचा अर्थ असा की जपाचा नामस्मरणामुळे मनातच पालट होतो असे नाही तर शरीरातही बदल होऊ लागतात. ते हळूहळू साधनास अनुकूल असे होऊ लागते. अध्यात्मिक आरोग्य सुधारू लागते. आधी होणार त्रास ही शरीर अनुकूल बनण्याची पूर्वतयारी असते. अर्थात जो तळमळीने या साधनाकडे वळलेला असेल त्याला साधन करतांना देहाचे बरेवाईट झाले तरी त्याची पर्वा नसते. त्याची तशी तयारीही झालेली असते. पु.श्रीब्रह्मानन्द महाराजांना खूप वेळा जप केल्यामुळे अतिसार होत असे. श्रीअण्णासाहेब घाणेकरांना पचनाचा त्रास व पुढे मूळव्याध झाली. त्यांना श्रीमहाराजांनी जप कमी करायला सांगितला.
TechRepublic Blogs
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment