*मंदिरात दोष पाहु नयेत* *साधकांसाठी महत्वाचे*
एकदा श्री टेंबे स्वामी तथा वासुदेवानंद सरस्वती मंदिरात पूजेस बसले असता
"कुणी तरी मंदिरात नैवेद्यासाठी प्रसादाचे पंचपक्वानांचे ताट आणून दिले."
प्रसादाचे ताट पाहून तेथील ब्राह्मण पुजा-याचा मोह अनावर झाला. त्याने ते नैवेद्य भरलेले ताट त्वरित खाल्ले.
तेंव्हा *श्री टेंबे स्वामी* फार चिडले. त्याला खूप बडबडले व नंतर पुजेस बसले.
पुजा संपल्यावर,
*"श्री गुरु दत्तात्रेयांना" गाभाऱ्यातून निघून जाताना त्यांनी पाहिले.*
त्यानंतर तीन दिवस त्यांना *श्री गुरु दत्ताञेयांनी दर्शन दिले नाही.*
ते बैचेन झाले. ऱ्यांना कळले मी पुजा-याला टाकून बोललो म्हणून श्रीगुरु दत्ताञेयांना राग आला असणार!
तेव्हा *श्री टेंबे स्वामी* सरस्वतींच्या डोळ्यातून *अश्रू वाहू लागले.* तसेच त्यांच्या मुखातून *करुणा ञिपदीचे बोल बाहेर पडले.*
"शांत हो श्रीगुरु दत्ता, मम चित्ता शमवी आता" ।।
"शांत हो श्रीगुरु दत्ता, मम चित्ता शमवी आता" ।।
*करुणा ञिपदीचे* हे बोल ऐकून *श्री गुरु दत्ताञेय*
श्री टेंबे स्वामी सरस्वतींच्या समोर उभे राहिले.
तेव्हा *श्री टेंबे स्वामी म्हणाले,* "देवा माझे काही चुकले असे मला वाटत नाही. *तुला नैवैद्य दाखवायच्या अगोदर त्या पुजा-याने तो खाऊन टाकला".*
तेव्हा *श्री गुरु दत्ताञेयांनी* प्रश्न केला, *"इथे सत्ता कोणाची?*
" ह्या प्रश्नावर श्री टेंबे स्वामी म्हणाले, *"देवा इथे सत्ता तुमची आहे. इथे सारे तुमच्या इच्छेने चालते ".*
त्यावर *श्री गुरु दत्ताञेय* म्हणाले, अरे, *तो पुजारी गेली तीन दिवस उपाशी होता, त्याच्या साठी मी ते ताट पाठवले होते. ते त्याने खाल्ले.*
त्यात तुझे काय गेले ?
*त्यावर श्री टेंबे स्वामी सरस्वतींना आपली चूक कळली व श्री गुरु दत्ताञेय अंतर्धान पावले.*
या *अध्यात्मिक मार्गात* प्रामाणिक पणे वाटचाल करणाऱ्या माणसाची *देवाकडून, गुरु कडून क्षणाक्षणाला परीक्षा बघितली जाते. इतका हा मार्ग कठीण आहे.*
*टेंबे स्वामी हे अधिकारी पुरुष होते*.
एका रागामुळेत्यां ची ही अवस्था झाली.
*आपण तर सामान्य माणस* आपण जर राग आवरु शकलो नाही तर,
*आपली आयुष्यभराची साधना व्यर्थ ठरु शकते.*
*आपण ज्या मंदिराला जातो तेथे एकच गोष्ट लक्षात ठेवावी,*
*त्या मंदिरात त्या देवाची सत्ता असते, तिथे काय घडते ते पाहू नये.*
तिथे चालणाऱ्या सर्वच गोष्टींकडे त्या देवतेचे लक्ष असते.
*"मंदिरातील सेवेकरी, पुजारी, विश्वस्त यांचे सर्व कृत्य त्या देवाला माहीत असते".*
*ज्या ठिकाणी ईश्वरी शक्तीचे सत्तेचे अधिष्ठान असते*
तेथे सामान्य माणसाने फक्त *ईश्वरी इच्छेचा आदर करावा.*
*।।श्री गुरुदेव!*श्री स्वामी समर्थ।।
No comments:
Post a Comment