आपण जो गोंदवल्यास किंवा घरी आपण एक काकड आरती म्हणतो.."उठी उठी बा महाराजा 'ही आरती परम पूज्य ती तात्यासाहेब केतकर यांनी लिहिलेली आहे.
पू तात्या साहेब केतकरांकडून वाणी रूप आविष्कार झाला. म्हणजे तात्या पेटीवर बसत आणि महाराज त्यांच्या मुखातून बोलत. पू तात्या अतिशय लीन आणि नम्र आणिअत्यंत शुद्ध अंतःकरणाचे होते. जर त्यांना कोणी नमस्कार केला तर त्यांचे पाय आत मध्ये आकुंचित व्हायचे. हे सर्व सन्कोचाने व्हायचे.
नेहमी ते दुसऱ्याना पण नम्र होऊन नमस्कर कारवायास तत्परतेने तैयार असत. आता सांगायचे हेच की जी काकड आरती म्हणतो त्यात शेवटच्या कडव्यात पू तात्या म्हणतात ''ब्रह्मानंद आनंद सागर तुमचे चरणी झाले स्थिर (महाराजांच्या )चरणी स्थिर यांचे चरणीचा (म्हणजे ब्रहम्नन्द बुवा आणि आनंद सागर)यांचा किन्कर दर्शन सूख प्रार्थतसे. ह्यात त्यांनी स्वतःचे नाव गुंफले नाही. केवढी ही लीनता.
त्या मूळे काकड्यात म्हटले जाणारे हे पद pure soul असणाऱ्या पू तात्या साहेब केतकरांनी लिहीलं आहे हे खुप लोकांना माहीत नाही.
*🌸 नाम पुष्प 🌸*
🙏🏻🌹 श्रीराम समर्थ 🌹🙏🏻
No comments:
Post a Comment