TechRepublic Blogs

Thursday, February 15, 2024

एकाने

 *तसे पाहिल्यास* 

*"  श्रीराम " आणि " श्रीकृष्ण "*

 *हे  दोघेही भारतीय इतिहासातील दोन अतुल्य महानायक आहेत. !!* 

*एकाने "अयोध्या ते रामेश्वर" पर्यंतचा*

 *तर दुसऱ्याने "द्वारका ते आसाम" पर्यंतचा भूभाग आपल्या चरित्राद्वारे सांधत. गेली हजारो वर्षे ह्या भारतभूमीला संस्कारांच्या अनोख्या बंधनात बांधून ठेवले आहे.!*

*तस तर दोघांच्या चरित्रात जन्मापासूनच किती विरोधाभास आहे नाही कां?.* 

*एकाने जन्म घेतला तो  रणरणत्या उन्हात आणि तो ही भरदुपारी, तर दुसऱ्याने जन्म घेतला तो मुसळधार पावसात आणि तो  ही मध्यरात्री !!* 

*एकाचा जन्म राजमहालात तर दुसऱ्याचा जन्म कारागृहात !!*

*साम्य म्हणाल तर दोघांच्याही हातून पहिल्या मारल्या गेल्या त्या राक्षसिनीच.....*  

*एकाकडून त्राटिका आणि दुसऱ्याकडून पुतना!* 

*शबरीची बोरे आणि सुदाम्याचे पोहे  हे त्यांच्या मनमिळाऊ मैत्रीपूर्ण स्वभावाचे उदाहरण म्हणून आजही सांगितले जाते.* 

*ज्यांच्यामुळे यांच्या चारीत्र्याला वेगळे वळण लागले त्यादोघी म्हणजे  कैकेयी आणि गांधारी या एकाच प्रांतातल्या...*

*ह्या दोघी मातांच्या कटू शब्दांना वंद्य मानत त्यां दोघांनी ही आनंदाने स्वीकारले.!!* 

*एकाने सुग्रिवाला त्याचे राज्य मिळवून दिले. तर दुसऱ्याने युधिष्ठिराला !*

*एकाने लोकापवादाखातिर पत्नीचा त्याग केला. तर दुसऱ्याने लोकापवादाची चिंता न बाळगता सोळा सहस्त्र स्त्रियांचा स्वीकार केला.!!* 

*एकाने वडिलांचे शब्दासाठी आणि क्षात्रधर्मासाठी कुटुंबीयांचा त्याग करत वनवास स्वीकारला. त्यात गैर मानले नाही. तर दुसऱ्याने क्षत्रियधर्मासाठीच कुटुंबियांवर शस्त्र उगारण्यास देखील गैर मानले नाही.*

*एकाने जन्मभूमीला स्वर्गासम मानले. तर दुसऱ्याने कर्मभूमीला स्वर्ग बनवले.*

*एकाने अंगदाकरवी शिष्टाई करुन तर दुसऱ्याने समक्ष शत्रूच्या दरबारी जाऊन शिष्टाई करत युद्धहानी टाळण्याचा प्रयत्न अखेरपर्यंत केला.*

*एकाने समुद्र ओलांडून सोन्याची लंकापुरी नष्ट केली. तर दुसऱ्याने समुद्र ओलांडून सोन्याची द्वारकापुरी उभारली.*

*एकाने झाडामागुन बाण मारल्या गेलेल्या वालीच्या मुखातून झालेली निंदा स्वीकारली. तर दुसऱ्याने झाडामागुन बाण मारणाऱ्या व्याधाच्या हातूनच मृत्यू पत्करला.*

*पहिला  Theory.... आहे. तर...दुसरा Practical  आहे.!!* 

*दोन प्रचंड विरोधाभास असलेल्या ह्या व्यक्तीरेखा गेली हजारो वर्षे नाना विविध प्रक्षिप्त कथांचा स्वीकार करत आपल्या चारित्र्याच्या मूळ गाभ्याला धक्का न लावता ह्या देशापुढे*

 *"दीपस्तंभ" बनून उभे आहेत आणि इथून पुढे देखील असेच रहातील.!!*

*जय श्रीराम ... जय श्रीकृष्ण !!*

🙏🏻🙏🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment