TechRepublic Blogs

Sunday, February 11, 2024

संत

 

           श्रीराम,

       काम, क्रोध, लोभ, मत्सर इ. विकार आपल्या मनातून कसे काढून टाकायचे ह्याचे मार्गदर्शन संत आपल्याला करतात. जगातले विषय आले की त्यांच्याबरोबर अपरिहार्यपणे विकार येतातच. जसे देह आणि दुःख कायम एकत्र असतात त्याप्रमाणे विषय वासना आणि विकार देखील एकमेकांना सोडून रहात नाहीत.

               वासना म्हणजे देवाच्या विरुद्ध असलेली आपली इच्छा होय. जेव्हा देव हवा असे वाटते ती देवाची बुद्धी असते. तर विषय हवा असे वाटते ती देहाची बुद्धी असते. ही देहाची बुद्धी जाण्यासाठी सर्व विषय वासना सोडून एका भगवंताला शरण जावे. देहबुद्धी गेली की जीवनातील समूळ दुःखाचा नाश होतो.. तसे मनातील विषय गेले की विकार लोप पावतात.

                क्रोध, संताप कधीही आला तरी तो खेदकारीच असतो.

         संतापाचे काही प्रकार बघुया. 

१)प्रतिक्रिया म्हणून आलेला. 

२)आवश्यकता म्हणून आणलेला संताप 

३)गिळलेला संताप. ह्यात संताप तर आला आहे पण व्यक्त करता येत नाही. 

आपण ज्याठिकाणी कार्यरत असतो, तेथील वातावरण बिघडू नये यासाठी काहीवेळा संताप गिळावा लागतो.

 अशा प्रकारे सोसणे सहन करणे किंवा गिळणे साधकासाठी समर्थनीय नसते. त्याऐवजी संतापाचे कारण शोधून संताप येऊच नये अशी व्यवस्था करणे अधिक लाभदायी ठरते.

                      ||श्रीराम ||

No comments:

Post a Comment