TechRepublic Blogs

Tuesday, February 13, 2024

साधक

 एकदा एका साधकाने श्री.गोंदवलेकर महाराजांना विचारले की " महाराज अनुसंधान साधण्यासाठी मौनाची फार जरुरी आहे असे वाचनात आले , हे आम्हां प्रापंचिकांना जमावे कसे? श्री.महाराज म्हणाले "ही गोष्ट दोन - तीन टप्पांनी सहज साधण्यासारखी आहे. प्रथम असे करावे की स्वतःची स्तुती आणि दुसऱ्याचा दोष याबद्दल बोलायचे नाही. कुठल्याही व्यक्तीबद्दल कसलीही रिकामटेकडी चर्चा करावयाची नाही असा निश्चय करायचा. या बाबत फार जागरूक रहावे लागते. एव्हढे सांभाळले तरी आपले बोलणे पन्नास टक्यांनी कमी होईल. नंतर काही बोलावेसे वाटेल तेव्हा मनात विचार करावा की हे बोललेच पाहिजे का ? हा विचार करत गेलात की आणखी चाळीस टक्के बोलणे वाचेल. अशा प्रकारे नव्वद टक्के वेळ आणि लक्ष नामाच्या अनुसंधनाच्या कामी लावता येईल. बाकी दहा टक्के आगदी आवश्यक असेल तसे बोलणे होईल त्याने मौन भंगेल असे प्रापंचिकाने मानण्याचे कारण नाही."

No comments:

Post a Comment