TechRepublic Blogs

Thursday, June 13, 2024

साम्यावस्था

 श्रीगोंदवलेकर महाराज म्हणाले "माणसात द्वैत आहे" द्वैत म्हणजे दोन. आदी शंकराचार्य तर अद्वैत म्हणतात. मग हे द्वैत काय आहे ? श्रीगोंदवलेकर महाराज म्हणाले 

" द्वैत काय आहे तर एक थोरला मी आणि एक धाकटा मी" मुंडक उपनिषदांमध्ये एक मंत्र आहे. " द्वा सुपर्णा सयुजा सखाया." म्हणजे  दोन चांगले पंख असलेले पक्षी  एकत्र राहतात. ते सखे आहे . सखे म्हणजे हा आला की तो आला. ते दोघे एकच आहे. त्यांच्यात भेद नाही. उद्धव व अर्जुन हे कृष्ण परमात्म्याचे सखे आहेत. हे पक्षी सखे आहेत म्हणजे जीव आला की ईश्वर आला. त्याला शिव म्हटलेले आहे. एकाच झाडावर वर म्हणजे एकाच देहात दोघे राहतात. 

श्रीमहाराज म्हणाले की एक मोठा मी आहे एक धाकटा मी आहे. जीव आणि शिव. ईश्वराला जीवाची जरूर काय आहे ? यावर श्रीमहाराज म्हणाले " ईश्वर म्हणजे शासन करणारा, नियमन करणारा. तर जीव नसला तर नियमन कोणाचे करणार ?"  म्हणजे जीव आला की ईश्वर आलाच. जीव ईश्वराला केव्हा खरे मानतो तर साम्यावस्था झाली की.

 या आठांची, (पंचमहाभूत, मन बुद्धी अहंकार) साम्यावस्था म्हणजे " जे आहे ते उत्तम आहे. जे आहे ते पूर्ण आहे. याच्यापेक्षा चांगलं असणं शक्य नाही असं वाटलं पाहिजे." ही ती साम्यावस्था. म्हणजे बास तृप्ती. साम्य तेव्हाच येईल तृप्ती आली की. माझ्या मनाविरुद्ध झालं, दुःख आलं अपमान झाला तर मी काय शिकावं यांच्या पेक्षा चांगलं असणं शक्य नाही ही दृष्टी ठेवली ना तर कडू औषध माणूस बरं होण्यासाठी घेतो तसं होईल. 

मग सद्गुरूंना म्हणावे आपल्याला मला बनवायचे आहे तसे बनवा. मग मला दुःख द्या, आणखी द्या. पोलाद असत ना त्याला तापवल्याशिवाय ते वळत नाही. तसे आपण आहोत. आपल्याला तापवायला दु:खाशिवाय पर्याय नाही. आपण जरा तापलो की सुख मागतो.

No comments:

Post a Comment