एकदा एका साधकाने पु.श्रीरामकृष्ण परमहंसांना विचारले " मी इतकी धर्मचर्चा करतो चिंतन मनन ही करतो, असे असून माझ्या मनात वाईट विचार का येतात ?"
पु.श्री.रामकृष्ण म्हणाले " एका माणसाने एक कुत्रे पाळले होते.रात्रंदिवस तो त्या कुत्र्याचे लाड करीत असे. तो त्याला कधी मांडीवर घेऊन बसायचा, तर कधी त्याच्या तोंडाला तोंड लावून बसायचा.
त्याचे हे वेडेपणाचे वागणे पाहून एक दिवस एका शाहण्या माणसाने त्याला त्या बद्धल हटकले आणि समजावले " बाबा रे कुत्र्याला इतके आंजारणे गोंजारणे चांगले नाही . काहीही झाले तरी शेवटी तो पशु आहे.
एखादे दिवशी तो चावला म्हणजे पंचाईत होईल." हे म्हणणे त्या माणसाला पटले. त्याने लगेच त्या कुत्र्याला मांडीवरून दूर लोटले आणि पुन्हा कधी त्याला मांडीवर न घेण्याची शपथ घेतली. पण हे कुत्र्याला कसे समजणार ? तो तर मालकाला पाहताच धावत यायचा आणि त्याच्या मांडीवर चढण्याचा प्रयत्न करायचा. पुष्कळ दिवस मालकाने त्या कुत्र्याला मारठोक केल्यानंतरच त्याची ती सवय गेली. तुमची (साधक) देखील हीच दशा आहे.
ज्या कुत्र्याला तुम्ही इतके दिवस आंगाखांद्यावर घेतलेत त्याच्यापासून आता तुम्ही आपली सुटका करून घेऊ इच्छित असला तरी तो सहजासहजी तुम्हाला कसे बरे सोडील ? पण काही हरकत नाही . आता यापुढे त्याचे लाड करू नकोस आणि तो मांडीवर चढू लागताच त्याला चांगला ठोकून काढ. असे केल्याने थोड्याच दिवसांत तू वाईट विचारांच्या कचाट्यातून पूर्णपणे सुटशील."
No comments:
Post a Comment