*प्रपंच आम्हांला सुख देईल ही आमची कल्पनाच नाहीशी झाली पाहिजे. म्हणजे प्रपंचाची हावही कमी होईल, आणि नंतर कर्तव्यापुरतेच आम्ही प्रपंचात राहू. जोपर्यंत प्रपंचाकडे आमची दृष्टी आहे तोपर्यंत आम्हाला समाधान कालत्रयीही मिळणे शक्य नाही.* *नामाच्या सहवासात राहिल्याने देहावरचे प्रेम आपोआप नष्ट होईल, आणि मग देहाने मांडलेल्या प्रपंचावरचेही प्रेम कमी होईल,आणि पुढे त्याला सर्वत्र परमेश्वरच दिसेल.प्रपंच सुखाचा करणे याचेच नाव परमार्थ होय....
*🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*
*🌹पुष्कळ माणसे पुष्कळ नाम घेतात. त्याने पुण्यसंचय झाल्याशिवाय राहात नाही. पण नाम अध्यात्माच्या भूमिकेवर चालणे म्हणजे काय हे समजणे जरूर आहे. भगवंताचे नाम घेताना आपण भगवंताचे नाम घेत आहोत हे भान सारखे टिकत नाही. तसेच नामापरते सत्य नाही ही जाणीव राहात नाही. म्हणून जेथे जिवंत नाम चालते तेथे त्याच्याबरोबर भगवंताच्या अस्तित्वाची जिवंत जाणीव वास करते. 🌹*
*🌸परमपूज्य बाबा बेलसरे🌸*
No comments:
Post a Comment