चिंतन
श्रीराम,
हा जो शून्य अंतराचा, शून्य अंतरीचा प्रवास आहे, ह्यात सगळ्यात मोठी अडचण निर्माण करणारे मन आहे. हे मनच आहे जे अविद्येच्या बंधनातून मोकळे करते. हे मोकळे होणे म्हणजेच मोक्ष प्राप्त होणे. आपले संत सांगतात की सायुज्यता मुक्ती प्राप्त करण्यातच मिळालेल्या नरदेहाचे सार्थक आहे.
आपण, आपल्याला जी मोकळीक हवी असते त्याला मोक्ष म्हणतो.. आणि आपल्या बुद्धीने आपल्याला जे हवे ते करत राहतो. संतांना हे अपेक्षित नाही. ते सांगतात की, जीवाला स्वतःच्या बुद्धीच्या गाढवावर बसून भवसागर कधीच पार करता येत नाही. कारण कोणत्या क्षणी तो गटांगळ्या खाईल आणि बुडेल हे त्याचे त्याला देखील समजणार नाही. म्हणून परमार्थाच्या अभ्यासात, मला काय वाटते हे महत्वाचे नसून संतांना काय अपेक्षित आहे.. सद्गुरूंना काय अपेक्षित आहे.. आणि त्यांच्या विचारांवर आपण साधना करत आहोत का? हे फार फार महत्वाचे असते.
||श्रीराम |¦
No comments:
Post a Comment