TechRepublic Blogs

Monday, June 17, 2024

वैराग्य

 श्रीराम समर्थ


         विवेकातून वैराग्य आले तरच त्या विवेकाचे महत्व. असे वैराग्य आले की नामात गोडी वाटू लागेल. *विवेकाचे इंजिन चालण्यासाठी त्याला भावनेची, तळमळीची वाफ पाहिजे असे श्रीमहाराज म्हणत.* तळमळ हे परमार्थाचे मर्म आहे कारण त्यातून शरणागती येते. पण हे सर्व गुरुकृपेने होते. तुम्ही म्हणाल, असे जर आहे तर आपल्या प्रयत्नांना काही अर्थ आहे की नाही ? प्रयत्नांना निश्चित महत्व आहे कारण *प्रयत्न केल्यानंतरच प्रयत्नाने काही होत नाही हे समजून येईल.* आधी प्रयत्न, त्यातून शरणागती व मग गुरुकृपा. प्रयत्नांती परमेश्वर खरेच आहे. आज प्रयत्न करणे येवढेच आपल्या हातात आहे. *खरोखर सगुणाचे महत्व पटणे व त्याविषयी प्रेम वाटणे कठीण आहे. वामनपंडितांना सगुणाचे महत्व पटवून देताना समर्थांनी शेवटी हनुमानाचे रूप धारण केले तेव्हा कोठे त्यांचा सगुणावर विश्वास बसला !*


               ---------- *प्रा के वि [पू बाबा] बेलसरे.*


               *********


No comments:

Post a Comment