TechRepublic Blogs

Sunday, June 2, 2024

ध्येय

 *जीवनातील ध्येय*


*जीवन फक्त धनसंचय तसेच भोग भोगण्यापुरतंच सीमित नाही. भोग भोगताना त्यापासून* *आनंद मिळवणे  हाच मुख्य उद्देश असतो.* *आनंदासाठीच भोग हवे हवेसे वाटतात. सुख हंव हंवस वाटतं. प्रशंसा परोक्ष किंवा अपरोक्ष कानावर आली की कसं कुरवाळल्या सारखं वाटतं.* *गोंजारल्यासारखं वाटतं. आनंद मिळतोच. मनुष्य जीवन जगताना दैनंदिन व्यवहारासोबत नकळत सुखप्राप्तीचे, म्हणजे पर्यायाने आनंद प्राप्तीचे, प्रयत्न करीतच* *असतो. सुख भोग भोगताना आनंद प्राप्त होतो. एवढा एकच रस्ता माहीत आहे. असंख्य पिढ्या मनुष्याची तीच वहिवाट आहे. शोधल्यास अनेक मार्ग मिळतील. परंतु वहिवाटीचा रस्ताच बरा, असा विचार करून  मनुष्य राजरस्ताच स्विकारतो.*  *भोगप्राप्तीसाठी आयुष्यभर प्रयत्न करतो. भोग केवळ प्रस्तुत जन्मापुरतेच नव्हे मृत्यू पश्चात् स्वर्गप्राप्ती द्वारे दिव्य भोग भोगायला मिळण्यासाठी* *पण प्रयत्न असतात. विचार स्वर्गप्राप्ती या संकल्पने पेक्षां उंच  झेपावत नाहीत. तसेच झेपत नाहीत. भिती वाटते.*


*अध्यात्मशास्त्रानुसार परमेश्वरप्राप्ती, भगवप्राप्ती, हेच उच्चतम ध्येय ठरवावे अशी शिफारस केली आहे.*


*परमेश्वराचे अस्तित्व आहे किंवा नाही? येथ पासूनच संभ्रम आहे. परमेश्वरप्राप्ती हा केवळ* *कल्पनाविलासच वाटतो. हे खरं असू शकेल यावर विश्वास ठेवलाच जात नाही.* *बुध्दीच्या जोरावर पटत नसेल. परंतु समस्याग्रस्त मनुष्य मानसिक आधारासाठी, तसेच सर्व भौतिक प्रयत्न करून* *थकल्यावर शेवटी मदतीसाठी,  परमेश्वराकडेच धाव घेतो. त्यावेळेस भावनेला महत्व देऊन परमेश्वराचे अस्तित्व मान्य* *केले जाते. तेव्हां अशा उलट सुलट विचारांच्या संभ्रमात अडकून पडू नका. परमेश्वरप्राप्ती हे वास्तवच* *आहे. कल्पनाविलास नव्हे. असंख्य संत सत्पुरुषांनी या अवस्थेचा अनुभव घेतलेला आहे. अनुभव घेत घेत स्वत:चे ऊर्वरित जीवन व्यतित केले आहे.*


*परमेश्वरप्राप्ती हे ध्येय निश्चित करा. ते स्वप्न सत्यात उतरवण्याचे* *अटोकाट प्रयत्न करा. त्यानुसार मानसिकता* *बदला, विचारसरणी बदला. मग जीवनात कसा आनंद फुलतो त्याचा स्वत: अनुभव घ्या. जीवन आनंदाचा आस्वाद घेत जगायचं असतं. रडत खडत जीवनाचा गाडा ओढायचा नसतो.*

 *संकलन आनंद पाटील*

No comments:

Post a Comment